शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

गो रक्षणासाठी मनुष्याचा बळी नको! - रामदास आठवले

By admin | Updated: July 30, 2016 12:25 IST

गुजरातमधील उना येथील गो रक्षकांनी दलित तरूणांना केलेल्या मारहाणीवरून वातावरण तापलेले असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या मुद्यावर भाष्य केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - गुजरातमधील उना येथील गो रक्षकांनी दलित तरूणांना केलेल्या मारहाणीवरून वातावरण तापलेले असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या मुद्यावर भाष्य करताना ' गो रक्षण करताना मनुष्याचा बळी द्यायला नको' असे म्हटले आहे. ' माणसं मारून गाईंचे रक्षण व्हायला लागले तर मनुष्याचे रक्षण कोण करणार?' असा सवाल त्यांनी  ' इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारला.
अहमदाबाद येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गाईंचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. त्याच मुद्यावरून संपूर्ण देशातील वातावरण तापलेले असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची निंदा करतानाच राज्यातील भाजप सरकार दलितविरोधी असल्यानेच कोणतीही कारवाई होत नाही' अशी टीका केली होती. 
या संपूर्ण मुद्यावर रामदास आठवले यांनी प्रथमच भाष्य केले. गोरक्षक चुकीचा मार्गाचे अवलंबन करत असल्याचे ते म्हणाले. गाईंची हत्या रोखण्यासाठी राज्यात कायदा तयार करण्यात आला आहे, त्या माध्यमातूनच त्यांचे रक्षण व्हायला हवे.   
त्यांचे तुम्ही गायींचे रक्षण करा पण त्यासाठी माणसाची हत्या का करता? माणसांचा जीव घेऊन तुम्ही गायींचे रक्षण करणार असाल तर मानवाचे रक्षण कोण करणार? असा सवाल त्यांनी विचारला.