शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

गो रक्षणासाठी मनुष्याचा बळी नको! - रामदास आठवले

By admin | Updated: July 30, 2016 12:25 IST

गुजरातमधील उना येथील गो रक्षकांनी दलित तरूणांना केलेल्या मारहाणीवरून वातावरण तापलेले असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या मुद्यावर भाष्य केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - गुजरातमधील उना येथील गो रक्षकांनी दलित तरूणांना केलेल्या मारहाणीवरून वातावरण तापलेले असतानाच सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं नेते रामदास आठवले यांनी या मुद्यावर भाष्य करताना ' गो रक्षण करताना मनुष्याचा बळी द्यायला नको' असे म्हटले आहे. ' माणसं मारून गाईंचे रक्षण व्हायला लागले तर मनुष्याचे रक्षण कोण करणार?' असा सवाल त्यांनी  ' इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारला.
अहमदाबाद येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गाईंचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. त्याच मुद्यावरून संपूर्ण देशातील वातावरण तापलेले असून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची निंदा करतानाच राज्यातील भाजप सरकार दलितविरोधी असल्यानेच कोणतीही कारवाई होत नाही' अशी टीका केली होती. 
या संपूर्ण मुद्यावर रामदास आठवले यांनी प्रथमच भाष्य केले. गोरक्षक चुकीचा मार्गाचे अवलंबन करत असल्याचे ते म्हणाले. गाईंची हत्या रोखण्यासाठी राज्यात कायदा तयार करण्यात आला आहे, त्या माध्यमातूनच त्यांचे रक्षण व्हायला हवे.   
त्यांचे तुम्ही गायींचे रक्षण करा पण त्यासाठी माणसाची हत्या का करता? माणसांचा जीव घेऊन तुम्ही गायींचे रक्षण करणार असाल तर मानवाचे रक्षण कोण करणार? असा सवाल त्यांनी विचारला.