शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नोकऱ्या देत नसाल राजीनामा द्या- उद्धव ठाकरे

By admin | Updated: February 1, 2017 19:02 IST

रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 1 - रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली. मराठी तरुणांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बुलेट ट्रेनची स्वप्ने नको, आधी नोकऱ्या द्या. आजपावेतो भकडकथा भरपूर ऐकल्या. जमत नसेल तर प्रभू यांनी मंत्रिपद सोडावे. उद्धव म्हणाले की, दिल्लीत ज्या मराठी युवकांवर लाठीहल्ला झाला त्यांच्याबाबत सेनेला सहानुभूती आहेच. शिवसेनेचे खासदार खैरे, अडसूळ संसद मार्ग पोलीस स्थानकात सर्वप्रथम पोहोचले आणि त्यांनी या युवकांची विचारपूस केली. भाजपावर हल्लाबोलभाजपावर हल्लाबोल करताना ते शिडीसारखा वापर करतात, आणि माडीवर चढल्यावर शिडीवर लाथ मारतात, असे म्हटले आहे. लाचारी पत्करुन आम्हाला सत्ता नको असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर गोव्यात भाजपने मगोपला संपविण्याचा डाव रचल्याचा आरोपही केला. गोव्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली मधल्या काळात शिवसेनेने गोव्याकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केले, अशी प्रांजळ कबुली देताना उद्धव म्हणाले की, आपल्या विचारांची माणसे दुसऱ्या राज्यात जर काम करत असतील तर त्यांना अडचण येऊ नये म्हणून मध्ये पडलो नाही. भाजपला अडथळा नको म्हणून दुर्लक्ष केले पण भाजपने तत्त्वांना सोडचिठ्ठी देत गोमंतकीय जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते म्हणाले की, मगोपबरोबर युती व्हावी असे बाळासाहेबांना नेहमीच वाटत होते. १९९0 च्या दशकात म्हापशात मोठी सभा घेतली त्यावेळी त्यांनी तशी इच्छाही व्यक्त केली होती परंतु दुर्दैवाने ते शक्य झाले नाही. अर्थसंकल्पाबाबत कडवी प्रतिक्रियाकेंद्रीय अर्थसंकल्पाबाबत बोलताना उध्दव यांनी केंद्र सरकार मनमानी निर्णय घेत असल्याचा आरोप केला. गतवर्षीच्ी आश्वासने पूर्ण करु शकत नसाल तर अर्थसंकल्पाची गरजच काय, याचसाठी का बहुमत मागता? असा खडा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात कुठे केली होती, असा सवाल त्यांनी केला. बँकांमध्ये लोकांनी जे पैसे भरले त्यातून कर्जे बुडविणाऱ्यांचे पैसे फेडून घेण्यात आले. देशाची तिजोरी रिकामी केली. हे असेल चालू राहिले तर पुढील पाच वर्षात भिकेचा कटोरा घेऊन फिरावे लागेल. शिवसेनेने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. आयकर मर्यादा ५ लाखांवर न्यावी, ज्येष्ठ नागरिकांना कायम ठेवींवर व्याज वाढवून द्यावे, अशी मागणी केली होती. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देणार काय, या प्रश्नावर उध्दव यांनी आधी सरकार द्या, आणि काय करतो ते नंतर पाहा, असे उत्तर देताना जनतेला हव्या आहेत त्या गोष्टी करीन, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आलेले उ व यानी मगोपचे सुदिन ढवळीकर, गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. गोव्यात हे तिन्ही पक्ष युतीने निवडणूक लढवित आहेत. ढवळीकर यांनी २४ जागा युतीला मिळतील, असा दावा केला. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपबरोबर सत्तेत असताना शिवसेनेची गोव्यात वेगळी भूमिका का, या प्रश्नावर उध्दव म्हणाले की, काँग्रेस नको म्हणून नाईलाजाने आम्ही या दोन्ही ठिकाणी भाजपबरोबर आहोत. मात्र असे असेल तरी सत्तेवर अंकूश ठेवण्याचे काम करतोय.