शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

मला खलनायक बनवू नका - विजय मल्ल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 11:39 IST

बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात परतण्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचे म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळून गेल्याचा आरोप असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात परतण्यासाठी ही वेळ योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विजय मल्ल्या इतक्यात तरी भारतात परतणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 
संडे गार्डीयन या वर्तमानपत्राला ई-मेलवरुन दिलेल्या मुलाखतीत मल्ल्या यांनी मला खलनायक बनवू नका असे म्हटले आहे. आपल्याला नियमानुसार कर्ज मिळाले, बँकांनी सर्व बाबींची छाननी केल्यानंतर मला कर्जे दिले तसेच आपण कायद्यापासून पळत नसल्याचा दावा मल्ल्या यांनी केला आहे. 
भारतात आपण गुन्हेगार असल्यासारखा प्रचार सुरु आहे. त्यामुळे भारतात परतण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे मल्ल्या यांनी मुलाखतीत सांगितले. मागच्यावर्षी माझ्या विरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. पण त्यावेळीही मी पळालो नाही. मग आता मी गुन्हेगार असल्यासारखे चित्र का निर्माण केले जात आहे ? 
कर्ज थकबाकी हा व्यावसायिक विषय आहे. जेव्हा बँकांनी कर्ज दिले  तेव्हा त्यांना त्यामध्ये धोका असणार याची कल्पना होती. आमचा बिजनेस वाढत होता आणि अचानक एक दिवस बिजनेस खाली आला. मला खलनायक बनवू नका असे मल्ल्या यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.