शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

धारणेवर आधारित निर्णय नको

By admin | Updated: April 6, 2015 02:24 IST

न्यायपालिकेने धारणेवर आधारित निर्णय देण्यापासून दूर राहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या

नवी दिल्ली : न्यायपालिकेने धारणेवर आधारित निर्णय देण्यापासून दूर राहावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त परिषदेला संबोधित करताना दिला.न्यायाधीशांना पवित्र मानले जात असून राजकीय वर्गाप्रमाणे त्यांना टीकेचा सामना करावा लागत नाही. त्यामुळेच त्यांनी अंतर्गत स्वयंमूल्यांकनाची यंत्रणा आणावी. न्यायालये मजबूत होत असताना न्यायपालिका परिपूर्ण बनावी जेणेकरून लोकांच्या अपेक्षांना उतरू शकेल, असेही ते म्हणाले. कायदा आणि घटनेच्या आधारावर निर्णय देणे सोपे आहे. धारणेच्या आधारावर निर्णय दिला जाऊ नय,े यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. न्यायपालिकेला पवित्र मानले जात असून ईश्वरानंतर दुसरे स्थान दिले जाते. स्वयंमूल्यांकनाचे आंतरिक तंत्र आवश्यक असून, ते एक कठीण कार्य आहे, असेही ते म्हणाले.राजकारणी भाग्यशाली आहेत, कारण लोक त्यांच्यावर नजर ठेवतात. आमचे मूल्यांकन लोक करतात. न्यायपालिका तेवढी भाग्यवान नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. न्यायाधीश कुणाला फाशीची शिक्षा ठोठावत असेल तरी ती व्यक्ती न्यायपालिकेवर विश्वास असल्याचेच सांगते. तेथे टीकेला खूप कमी वाव असतो. न्यायपालिकेने स्वयंमूल्यांकनाची यंत्रणा निर्माण करावी. त्यात सरकार आणि राजकारण्यांची कोणतीही भूमिका नसावी. अशी यंत्रणा समोर येणार नसेल तर न्यायपालिकेवर विश्वास किंचितही डळमळीत झाला तर देशाचे नुकसान होईल, असा इशाराही मोदींनी दिला.न्यायाधीश ईश्वरासमान लोक न्यायाधीशांना ईश्वरतुल्य मानतात. लोकांना न्यायपालिकेबाबत असलेली आस्था आजची नाही तर पारंपरिक आहे. ही आस्था आणखी तेजस्वी बनविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)