शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा
फोटो क्रमांक : 20पंड 5 व 6
फोटो ओळी - मंगळवेढा तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी. त्यांच्या विराट जनसमुदायासमोर बोलताना आ. भारत भालके
---
मंगळवेढा : गेल्या तीन महिन्यांपासून चारा व पाण्याअभावी जनावरांबरोबर माणसांची तडफड होत असताना झोपेत असलेले जिल्हाधिकारी दुष्काळाबाबत कोणतीही उपाययोजना करायला तयार नाहीत. माणसांच्या कैफियतची जाण नसलेल्या जिल्हाधिकार्‍यांना जागे करण्यासाठी जनावरांचा मोर्चा काढावा लागला आहे. शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत न पाहता चारा व पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करुन दुष्काळ जाहीर करावा अन्यथा जिल्?ातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालू असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयावर जनावरे, मेंढरांसह शेतकर्‍यांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. मोर्चास दामाजी पुतळ्यापासून सुरुवात झाली. या मोर्चात 400 बैलगाड्यांसह सुमारे दहा हजार शेतकरी उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी भालके बोलत होते.
आ.भालके म्हणाले, अच्छे दिन आणू म्हणणार्‍या भाजपने जनतेला फसविले आहे. निवडणुकीत रामराज्याची भाषा करणार्‍यांनी सध्या रावणाचे राज्य आणले आहे. सध्याचे फडणवीस सरकार व पालकमंत्री नेभळट असून जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांच्या शब्दाला शासन दरबारी कवडीची किंमत नाही. उजनीतील पाणी न सोडल्याने शेतकर्‍यांचे पंधरा हजार कोटींचे नुकसान होत आहे.
जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नसताना जिल्हाधिकारी मात्र हायड्रोफोनिक्स मक्याचा ट्रे घेऊन प्रात्यक्षिक दाखवून दुष्काळग्रस्तांच्या जळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. उजनीतून पाणी न सोडल्याने ऊस पिकांसह फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एकरी पन्नास हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. समान पाणी वाटपाचा कायदा असताना उजनीच्या वरील चौदा धरणे कशी काय भरून घेतली याबाबत प्रशासन मूग गिळून का गप्प बसले आहे. शिवाय उजनीतील पाणी सोडण्यास खुद्द जलसंपदा मंत्री व पालकमंत्री अनुकूल असताना अधिकार्‍यांचा विरोध केल्यामुळे यावरुन अधिकार्‍यांची मग्रुरी जिल्?ातील जनतेसमोर आली आहे.
यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार र्शीकांत पाटील यांना देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी चोख पोलीस बंदोबस्त केला.
यावेळी शशिकांत बुगडे, निर्मला काकडे, अरुणा दत्तू, सुरेश कोळेकर, पी.बी.पाटील, तानाजी खरात, रामेश्वर मासाळ, अर्जुन पाटील, फिरोज मुलाणी, भुजंगराव पाटील, भारत पाटील, पोपट पडवळे, दत्ता पडवळे, शिवानंद पाटील, जयंत साळे, संगीता क?े, मुझफ्फर काझी, विलास डोके, दीपक कलुबर्मे, विजय खवतोडे, सुहास पवार, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, रावसाहेब फटे, मारुती वाकडे, दत्ता गणपाटील, रामभाऊ वाकडे, दत्ता भोसले, दयानंद सोनगे, दिलीप जाधव, रणजित पाटील, काका डोंगरे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते.
---------------------------------
चौकट -
मोर्चातील जनावरांनी वेधले लक्ष

आज झालेल्या मोर्चामध्ये तब्बल चारशे बैलगाड्यांसह शेकडो शेळ्या, मेंढय़ांचा सहभाग होता. त्यामुळे ही जनावरेच सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.
-----------पूर्ण-------------