शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा
फोटो क्रमांक : 20पंड 5 व 6
फोटो ओळी - मंगळवेढा तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी. त्यांच्या विराट जनसमुदायासमोर बोलताना आ. भारत भालके
---
मंगळवेढा : गेल्या तीन महिन्यांपासून चारा व पाण्याअभावी जनावरांबरोबर माणसांची तडफड होत असताना झोपेत असलेले जिल्हाधिकारी दुष्काळाबाबत कोणतीही उपाययोजना करायला तयार नाहीत. माणसांच्या कैफियतची जाण नसलेल्या जिल्हाधिकार्‍यांना जागे करण्यासाठी जनावरांचा मोर्चा काढावा लागला आहे. शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत न पाहता चारा व पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करुन दुष्काळ जाहीर करावा अन्यथा जिल्?ातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालू असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयावर जनावरे, मेंढरांसह शेतकर्‍यांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. मोर्चास दामाजी पुतळ्यापासून सुरुवात झाली. या मोर्चात 400 बैलगाड्यांसह सुमारे दहा हजार शेतकरी उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी भालके बोलत होते.
आ.भालके म्हणाले, अच्छे दिन आणू म्हणणार्‍या भाजपने जनतेला फसविले आहे. निवडणुकीत रामराज्याची भाषा करणार्‍यांनी सध्या रावणाचे राज्य आणले आहे. सध्याचे फडणवीस सरकार व पालकमंत्री नेभळट असून जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांच्या शब्दाला शासन दरबारी कवडीची किंमत नाही. उजनीतील पाणी न सोडल्याने शेतकर्‍यांचे पंधरा हजार कोटींचे नुकसान होत आहे.
जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नसताना जिल्हाधिकारी मात्र हायड्रोफोनिक्स मक्याचा ट्रे घेऊन प्रात्यक्षिक दाखवून दुष्काळग्रस्तांच्या जळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. उजनीतून पाणी न सोडल्याने ऊस पिकांसह फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एकरी पन्नास हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. समान पाणी वाटपाचा कायदा असताना उजनीच्या वरील चौदा धरणे कशी काय भरून घेतली याबाबत प्रशासन मूग गिळून का गप्प बसले आहे. शिवाय उजनीतील पाणी सोडण्यास खुद्द जलसंपदा मंत्री व पालकमंत्री अनुकूल असताना अधिकार्‍यांचा विरोध केल्यामुळे यावरुन अधिकार्‍यांची मग्रुरी जिल्?ातील जनतेसमोर आली आहे.
यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार र्शीकांत पाटील यांना देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी चोख पोलीस बंदोबस्त केला.
यावेळी शशिकांत बुगडे, निर्मला काकडे, अरुणा दत्तू, सुरेश कोळेकर, पी.बी.पाटील, तानाजी खरात, रामेश्वर मासाळ, अर्जुन पाटील, फिरोज मुलाणी, भुजंगराव पाटील, भारत पाटील, पोपट पडवळे, दत्ता पडवळे, शिवानंद पाटील, जयंत साळे, संगीता क?े, मुझफ्फर काझी, विलास डोके, दीपक कलुबर्मे, विजय खवतोडे, सुहास पवार, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, रावसाहेब फटे, मारुती वाकडे, दत्ता गणपाटील, रामभाऊ वाकडे, दत्ता भोसले, दयानंद सोनगे, दिलीप जाधव, रणजित पाटील, काका डोंगरे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते.
---------------------------------
चौकट -
मोर्चातील जनावरांनी वेधले लक्ष

आज झालेल्या मोर्चामध्ये तब्बल चारशे बैलगाड्यांसह शेकडो शेळ्या, मेंढय़ांचा सहभाग होता. त्यामुळे ही जनावरेच सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.
-----------पूर्ण-------------