शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
2
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
3
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
4
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
5
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
6
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
7
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
8
Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल
9
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
10
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
11
सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
12
"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
13
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
14
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
15
चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
16
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
17
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
18
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
19
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
20
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा

शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत पाहू नका

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा

भारत भालके : मंगळवेढय़ात दुष्काळावर उपाययोजनेसाठी जनावरांचा मोर्चा
फोटो क्रमांक : 20पंड 5 व 6
फोटो ओळी - मंगळवेढा तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात सहभागी झालेले शेतकरी. त्यांच्या विराट जनसमुदायासमोर बोलताना आ. भारत भालके
---
मंगळवेढा : गेल्या तीन महिन्यांपासून चारा व पाण्याअभावी जनावरांबरोबर माणसांची तडफड होत असताना झोपेत असलेले जिल्हाधिकारी दुष्काळाबाबत कोणतीही उपाययोजना करायला तयार नाहीत. माणसांच्या कैफियतची जाण नसलेल्या जिल्हाधिकार्‍यांना जागे करण्यासाठी जनावरांचा मोर्चा काढावा लागला आहे. शेतकर्‍यांच्या संयमाचा अंत न पाहता चारा व पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करुन दुष्काळ जाहीर करावा अन्यथा जिल्?ातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन जिल्हाधिकार्‍यांना घेराव घालू असा इशारा आमदार भारत भालके यांनी दिला.
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळाकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयावर जनावरे, मेंढरांसह शेतकर्‍यांचा अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. मोर्चास दामाजी पुतळ्यापासून सुरुवात झाली. या मोर्चात 400 बैलगाड्यांसह सुमारे दहा हजार शेतकरी उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी भालके बोलत होते.
आ.भालके म्हणाले, अच्छे दिन आणू म्हणणार्‍या भाजपने जनतेला फसविले आहे. निवडणुकीत रामराज्याची भाषा करणार्‍यांनी सध्या रावणाचे राज्य आणले आहे. सध्याचे फडणवीस सरकार व पालकमंत्री नेभळट असून जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांच्या शब्दाला शासन दरबारी कवडीची किंमत नाही. उजनीतील पाणी न सोडल्याने शेतकर्‍यांचे पंधरा हजार कोटींचे नुकसान होत आहे.
जनावरांना चारा व पाणी उपलब्ध नसताना जिल्हाधिकारी मात्र हायड्रोफोनिक्स मक्याचा ट्रे घेऊन प्रात्यक्षिक दाखवून दुष्काळग्रस्तांच्या जळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. उजनीतून पाणी न सोडल्याने ऊस पिकांसह फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. एकरी पन्नास हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. समान पाणी वाटपाचा कायदा असताना उजनीच्या वरील चौदा धरणे कशी काय भरून घेतली याबाबत प्रशासन मूग गिळून का गप्प बसले आहे. शिवाय उजनीतील पाणी सोडण्यास खुद्द जलसंपदा मंत्री व पालकमंत्री अनुकूल असताना अधिकार्‍यांचा विरोध केल्यामुळे यावरुन अधिकार्‍यांची मग्रुरी जिल्?ातील जनतेसमोर आली आहे.
यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार र्शीकांत पाटील यांना देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांनी चोख पोलीस बंदोबस्त केला.
यावेळी शशिकांत बुगडे, निर्मला काकडे, अरुणा दत्तू, सुरेश कोळेकर, पी.बी.पाटील, तानाजी खरात, रामेश्वर मासाळ, अर्जुन पाटील, फिरोज मुलाणी, भुजंगराव पाटील, भारत पाटील, पोपट पडवळे, दत्ता पडवळे, शिवानंद पाटील, जयंत साळे, संगीता क?े, मुझफ्फर काझी, विलास डोके, दीपक कलुबर्मे, विजय खवतोडे, सुहास पवार, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, रावसाहेब फटे, मारुती वाकडे, दत्ता गणपाटील, रामभाऊ वाकडे, दत्ता भोसले, दयानंद सोनगे, दिलीप जाधव, रणजित पाटील, काका डोंगरे, पांडुरंग भाकरे आदी उपस्थित होते.
---------------------------------
चौकट -
मोर्चातील जनावरांनी वेधले लक्ष

आज झालेल्या मोर्चामध्ये तब्बल चारशे बैलगाड्यांसह शेकडो शेळ्या, मेंढय़ांचा सहभाग होता. त्यामुळे ही जनावरेच सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होती.
-----------पूर्ण-------------