शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

धार्मिक तणावासंदर्भात माझ्यासह कुठल्याही राजकीय नेत्याचं ऐकू नका, फक्त श्रद्धेय राष्ट्रपतींचं ऐका - नरेंद्र मोदी

By admin | Published: October 08, 2015 5:43 PM

नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत व नंतरच्या वादग्रस्त विधानांबाबत बोलताना सांगितले की, देशाला एकोपा आणि शांततेची गरज असून कुठल्याही राजकीय नेत्याचं अगदी माझंही ऐकू नका

ऑनलाइन लोकमत
नवाडा (बिहार), दि. ८ - दादरीमधल्या मुस्लीम हत्यप्रकरणी देशभरात रण उठले असताना नरेंद्र मोदींच्या मौनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत व नंतरच्या वादग्रस्त विधानांबाबत बोलताना सांगितले की, देशाला एकोपा आणि शांततेची गरज असून कुठल्याही राजकीय नेत्याचं अगदी माझंही ऐकू नका, आणि या विषयावर श्रद्धेय राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी जो संदेश काल दिलाय त्याचं पालन करा.
दादरी घटनेनंतर भाजपा संघपरीवारातील नेत्यांसोबतच समाजवादी पार्टीच्या, काँग्रेसच्या व अन्य पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर टिप्पणी केली आणि उत्तर भारतातील वातावरण हिंदू व मुस्लीमांमध्ये द्वेषपूर्ण होण्यास हातभार लागला. मात्र, या सगळ्यावर नरेंद्र मोदींनी चकारही शब्द काढला नव्हता. बिहारमधल्या प्रचारसभेत बोलताना मोदींनी देशाला विकासाची गरज असल्याचे सांगताना, जर देशात एकोपा नसेल, सद्भावना नसेल, शांतता नसेल तर काय उपयोग असे सांगत या विषयावर जातीय विद्वेष भडकवणा-या कुणाचंही ऐकू नका केवळ एकोप्याचा संदेश देणा-या प्रणब मुखर्जींचा संदेश ऐका असे आवाहन मोदींनी केले.
या सभेत मोदींनी काँग्रेस, नितिश कुमार व लालूप्रसाद यादव यांच्या युतीवरही तुफान टीका केली आणि बिहारचा विकास केवळ भाजपाच करू शकतं असा दावा केला.
 
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- धार्मिक वादग्रस्त विधानांबाबत बोलताना कुठल्याही राजकीय नेत्याचं ऐकू नका, अगदी माझंपण ऐकू नका. काल राष्ट्रपतींनी दिलेला संदेश तंतोतंत पाळा.
- आमचा सगळा रोख विकासावर असून विकासराज व जंगलराज अशी ही लढाई आहे. तीन तीन पिढ्या बरबाद झाल्या आहेत, अजून बरबादी नाही होऊ शकत. 
- मी दिलेली आश्वासनं पाळतो. लोकसभेच्यावेळी मी आश्वासन दिलं आणि बिहारला एक लाख ६५ हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिलं नी आश्वासन पाळलं. आता वीज, रस्ते, शाळा, रोजगार सगळं काही येईल.
- लालू, नितिश व काँग्रेस गेली ६० वर्षे एकमेकांच्या विरोधात लढत राहिले, परंतु आता खुर्चीच्या मोहापायी तिघं एकत्र आले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.
- नितिश कुमारांनी २०१० च्या निवडणुकांमध्ये गावागावात जात पाच वर्षांमध्ये वीज देण्याचे आश्वासन दिले होते की नाही असा सवाल मोदींनी विचारला. तसेच जर मी वीज दिली नाही तर परत निवडणूक लढवणार नाही असे सांगितले होते. पण त्यांनी वचन मोडलं आणि पुन्हा मत मागताहेत.
- बिहारला विकास पाहिजे. गेली अनेक दशके बिहारला विकासापासून वंचित ठेवणा-या सध्याच्या सरकारला धडा मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले.
- भारत एकसंध समाज म्हणूनच रहायला हवं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक राजकारण करू नका असं आवाहन केलं आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा एकोप्याच्या संदेशाचा पुनरुच्चार केला.
- धार्मिक राजकारण बंद व्हायला हवं असं सांगत सगळ्यांनी एकत्र सद्भावनेनं रहायला हवं असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दादरी हत्येवर मौन सोडलंय. बिहारमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते.