शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जमीन बळकावू देणार नाही

By admin | Updated: May 12, 2015 23:29 IST

संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली : संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केला. काँग्रेस पक्ष या ‘सुटाबुटाच्या सरकार’ला शेतकऱ्यांची जमीन बळकावू देणार नाही आणि संसदेत जर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही, तर शेतकऱ्यांची ही लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले.काँग्रेस या भूसंपादन विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करणार, असे लोकसभेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी निक्षून सांगितले. ते म्हणाले, ‘या सरकारला भूसंपादन विधेयक पारित करण्याची घाई झालेली आहे. पण हे तेवढे सोपे नाही. आम्ही हे विधेयक संसदेत रोखू शकलो नाही, तर रस्त्यावर जाऊन रोखणार. हे भूसंपादन विधेयक आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मानेवर कुऱ्हाड चालविली आहे.’ जलद विकासासाठी हे भूसंपादन विधेयक आणले असल्याच्या मोदी सरकारच्या दाव्यातील हवा काढताना राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘जमिनीअभावी १०० पैकी केवळ ८ प्रकल्प अडकलेले असल्याचे वित्त मंत्रालयानेच एका आरटीआयच्या उत्तरात सांगितले आहे. केंद्र सरकारकडे जमीन आहे, राज्यांकडे जमीन आहे आणि ‘सेझ’अंतर्गत अधिग्रहित करण्यात आलेली ४० टक्के जमीन अद्याप रिकामी पडलेली आहे. मग सरकार शेतकऱ्यांची जमीन बळकावण्यावर का अडून बसले आहे? मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन भांडवलदार आणि आपल्या औद्योगिक मित्रांना देऊ इच्छिते. कारण हे सुटाबुटातील सरकार आहे. संपुआ सरकारला भूसंपादन विधेयक आणण्यासाठी दोन वर्षे लागली होती; परंतु रालोआ सरकारने काही दिवसांतच त्या विधेयकाची हत्या केली.’ (प्रतिनिधी)