शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

जमीन बळकावू देणार नाही

By admin | Updated: May 12, 2015 23:29 IST

संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी

नवी दिल्ली : संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केला. काँग्रेस पक्ष या ‘सुटाबुटाच्या सरकार’ला शेतकऱ्यांची जमीन बळकावू देणार नाही आणि संसदेत जर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही, तर शेतकऱ्यांची ही लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले.काँग्रेस या भूसंपादन विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करणार, असे लोकसभेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी निक्षून सांगितले. ते म्हणाले, ‘या सरकारला भूसंपादन विधेयक पारित करण्याची घाई झालेली आहे. पण हे तेवढे सोपे नाही. आम्ही हे विधेयक संसदेत रोखू शकलो नाही, तर रस्त्यावर जाऊन रोखणार. हे भूसंपादन विधेयक आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मानेवर कुऱ्हाड चालविली आहे.’ जलद विकासासाठी हे भूसंपादन विधेयक आणले असल्याच्या मोदी सरकारच्या दाव्यातील हवा काढताना राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘जमिनीअभावी १०० पैकी केवळ ८ प्रकल्प अडकलेले असल्याचे वित्त मंत्रालयानेच एका आरटीआयच्या उत्तरात सांगितले आहे. केंद्र सरकारकडे जमीन आहे, राज्यांकडे जमीन आहे आणि ‘सेझ’अंतर्गत अधिग्रहित करण्यात आलेली ४० टक्के जमीन अद्याप रिकामी पडलेली आहे. मग सरकार शेतकऱ्यांची जमीन बळकावण्यावर का अडून बसले आहे? मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन भांडवलदार आणि आपल्या औद्योगिक मित्रांना देऊ इच्छिते. कारण हे सुटाबुटातील सरकार आहे. संपुआ सरकारला भूसंपादन विधेयक आणण्यासाठी दोन वर्षे लागली होती; परंतु रालोआ सरकारने काही दिवसांतच त्या विधेयकाची हत्या केली.’ (प्रतिनिधी)