शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

केवळ सरकार बदलू नका, भविष्याचाही विचार करा

By admin | Updated: May 9, 2016 03:19 IST

केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले.

कुट्टानाड : केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले. राज्यातील सत्तारूढ यूडीएफ आणि एलडीएफ यांच्याविरुद्ध हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, ‘या दोन्ही आघाड्यांनी एवढ्या वर्षांपर्यंत केरळमध्ये राज्य केले, पण त्यांना साधी पाण्याची समस्याही सोडविता आली नाही. काँग्रेस आणि माकपा एकमेकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा त्यांचा पराभव होईल, तेव्हाच त्यांना कळेल की, सरकारला जनतेसाठीही काम करावे लागते.’केरळ चारही बाजूने पाण्याने वेढलेले राज्य आहे, परंतु येथे अद्यापही पेयजल नाही. भारत पुढच्या वर्षी स्वातंत्र्याची ७० वर्षे पूर्ण करणार आहे. या काळात राज्यात एका पाठोपाठ एक अशी काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सरकारे सत्तेवर आली, पण त्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देता आले नाही. साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून न देणाऱ्यांना निवडून देणार काय? भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप होतो, तेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट एकत्र येतात, असा आरोप मोदींनी केला. (वृत्तसंस्था)