शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

बदलांनी विचलित होऊ नका, व्यवसायाकडे लक्ष द्या

By admin | Updated: October 26, 2016 05:15 IST

कंपनीच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलांनी विचलित होऊ नका, आपल्या व्यवसायाकडे, तसेच बाजारातील नेतृत्वाकडे लक्ष द्या, असे आवाहन टाटा सन्सचे

मुंबई : कंपनीच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलांनी विचलित होऊ नका, आपल्या व्यवसायाकडे, तसेच बाजारातील नेतृत्वाकडे लक्ष द्या, असे आवाहन टाटा सन्सचे नवे चेअरमन रतन टाटा यांनी मंगळवारी केले. आपली चेअरमनपदी झालेली निवड हंगामी स्वरूपाची आहे, नवा चेअरमन लवकरच शोधला जाईल, असेही टाटा यांनी सांगितले.सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर, रतन टाटा यांनी काल टाटा सन्सच्या सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर, आज त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. टाटाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये झालेली ही बैठक तीन तास चालली. उद्योग समूहाच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून, नंतर रतन टाटा यांच्या भाषणाचा तपशील माध्यमांना देण्यात आला. नेमले दोन नवे संचालकटाटा सन्सवर मंगळवारी राल्फ स्पेथ आणि एन. चंद्रशेखरन यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्पेथ या समुहातील जग्वार लॅण्ड रोव्हर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर चंद्रशेखरन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. (प्रतिनिधी)आपण सगळे मिळून समूहाची बांधणी करू या...टाटा यांनी सांगितले की, समूहाच्या कंपन्यांनी बाजारातील स्थान आणि स्पर्धा याकडे लक्ष द्यावे. आपल्या भूतकाळाशी तुलना करू नये. अनुयायीत्व पत्करण्यापेक्षा नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न करा. आम्ही आढावा घेऊ. गरजेनुसार निर्णय घेतले जातील. बदल झाल्यास तुमच्याशी चर्चा केली जाईल.मी तुमच्यासोबत काम करण्याबाबत आशावादी आहे. कारण भूतकाळात मी तुमच्यासोबत काम केलेले आहे. संस्थेने नेहमीच नेतृत्व करणाऱ्यांवर मात करून पुढे गेले पाहिजे. मला तुमचा अभिमान वाटतो. आपण सगळे मिळून या समूहाची बांधणी करू या. बैठकीवेळी, बॉम्बे हाउसबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.