शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता की जय’ची बळजबरी नको - भागवत

By admin | Updated: March 29, 2016 01:56 IST

‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील,

लखनौ : ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील, असा भारत आम्हाला घडवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.लखनौ येथे भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, जेथे लोक उत्स्फूर्तपणे भारतमाता की जय म्हणतील, असा श्रेष्ठ भारत आम्हाला घडवायचा आहे. त्यामुळे कुणावर हा नारा थोपविला जाता कामा नये. ‘भारतमाता की जय’च्या घोषणेवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे ठरते. भागवत म्हणाले, ‘आम्हाला (भारत) आमचे जीवन आणि कर्मामधून जगातील लोकांना मार्ग दाखवायचा आहे. कुणाला पराभूत करायची वा जिंकायची आमची इच्छा नाही. आम्हाला कुणावरही आमचे विचार आणि विचारसरणी थोपवायची नाही. आम्हाला केवळ त्यांना मार्ग दाखवायचा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे अंग आहे. संपूर्ण जगापुढे आम्हाला स्वत:चे आदर्श उदाहरण निर्माण करावयाचे आहे.’ (वृत्तसंस्था)