शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

‘भारतमाता की जय’ची बळजबरी नको - भागवत

By admin | Updated: March 29, 2016 01:56 IST

‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील,

लखनौ : ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील, असा भारत आम्हाला घडवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.लखनौ येथे भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, जेथे लोक उत्स्फूर्तपणे भारतमाता की जय म्हणतील, असा श्रेष्ठ भारत आम्हाला घडवायचा आहे. त्यामुळे कुणावर हा नारा थोपविला जाता कामा नये. ‘भारतमाता की जय’च्या घोषणेवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे ठरते. भागवत म्हणाले, ‘आम्हाला (भारत) आमचे जीवन आणि कर्मामधून जगातील लोकांना मार्ग दाखवायचा आहे. कुणाला पराभूत करायची वा जिंकायची आमची इच्छा नाही. आम्हाला कुणावरही आमचे विचार आणि विचारसरणी थोपवायची नाही. आम्हाला केवळ त्यांना मार्ग दाखवायचा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे अंग आहे. संपूर्ण जगापुढे आम्हाला स्वत:चे आदर्श उदाहरण निर्माण करावयाचे आहे.’ (वृत्तसंस्था)