शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

मंत्र्यांचे तोंडी आदेश पाळू नका!

By admin | Updated: October 24, 2014 03:38 IST

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिका-यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिकाऱ्यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असा ताजा फतवा पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) काढल्याने मंत्री आणि त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांना तोंडी हुकूम सोडून कामे करून घेण्याची सवय सोडावी लागणार आहे.‘पीएमओ’ने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या ताज्या कार्यालयीन आदेशात (ओएम) याचा समावेश असून वरिष्ठांनी तोंडी दिलेल्या आदेशाची लेखी पुष्टी केल्याशिवाय त्यानुसार पुढील पाऊल न उचलण्याचे बंधन सर्वच मंत्रालयांमधील अधिकाऱ्यांना पाळावे लागणारआहे. वरिष्ठांनी एखादी गोष्ट करण्याविषयी तोंडी सांगितले व तसे करणे नियमांत बसणारे असले तरीही त्याची लेखी पुष्टी करून घेण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेआहे.आपली मते किंवा निर्देश फाईलमध्ये लेखी न नोंदविता हवे असलेले काम तोंडी आदेश देऊन करून घेण्याची प्रवृत्ती अलीकडच्या वर्षांमध्ये मंत्र्यांमध्ये रूढ झाल्याचे दिसते. काही अधिकारी, जे काही सांगायचे ते फाईलवर लिहा, असा आग्रह धरतात; पण बऱ्याच वेळा लेखी नोंद न करताच अधिकारी मंत्र्यांच्या इच्छेनुसार कामे पार पाडतात. ‘पीएमओ’ने जारी केलेल्या या ताज्या निदेशांमुळे अशा मंत्र्यांना यापुढे अधिक सावधपणे काम करावे लागणारआहे.या संदर्भात पूर्वीपासूनच लागू असलेल्या; परंतु अभावानेच पालन केल्या जाणाऱ्या कार्यालयीन कामाच्या मॅन्युअलचा संदर्भ देत ‘पीएमओ’ने म्हटले आहे की, जेव्हा कोणाही अधिकाऱ्याला मंत्री किंवा त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांकडून तोंडी निर्देश दिले जातील तेव्हा असे निर्देश नियम वा प्रस्थापित पद्धतीला धरून असले तर संबंधित अधिकाऱ्याने, आपल्या लगेचच्या वरिष्ठाच्या ते निदर्शनास आणून द्यावेत. मात्र मंत्र्यांकडून दिलेले निर्देश नियमांत बसणारे नसतील तर तशी स्पष्ट नोंद करून संबंधित अधिकाऱ्याने ती बाब खात्याच्या सचिवाकडे न्यावी.या सर्वसाधारण नियमास अपवाद करताना मॅन्युअल म्हणते की, मंत्री आजारी किंवा दौऱ्यावर असताना एखाद्या तातडीच्या बाबीत त्यांच्याकडून फोनवरून तोेंडी निर्देश घ्यावे लागले तरी मंत्र्यांचे ते निर्देश त्यांच्या स्वीय सचिवांनी संबंधितांना लेखी कळवावे आणि मंत्री बरे झाल्यावर अथवा दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांच्याकडून अशा निर्देशाची लेखी पुष्टी घेतलीजावी. (लोकमत न्यूज नेटवर्क)