शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

मंत्र्यांचे तोंडी आदेश पाळू नका!

By admin | Updated: October 24, 2014 03:38 IST

केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिका-यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांमधील अधिकाऱ्यांनी लगेचच्या वरिष्ठांकडून लेखी निर्देश आल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, असा ताजा फतवा पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) काढल्याने मंत्री आणि त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांना तोंडी हुकूम सोडून कामे करून घेण्याची सवय सोडावी लागणार आहे.‘पीएमओ’ने गेल्या आठवड्यात जारी केलेल्या ताज्या कार्यालयीन आदेशात (ओएम) याचा समावेश असून वरिष्ठांनी तोंडी दिलेल्या आदेशाची लेखी पुष्टी केल्याशिवाय त्यानुसार पुढील पाऊल न उचलण्याचे बंधन सर्वच मंत्रालयांमधील अधिकाऱ्यांना पाळावे लागणारआहे. वरिष्ठांनी एखादी गोष्ट करण्याविषयी तोंडी सांगितले व तसे करणे नियमांत बसणारे असले तरीही त्याची लेखी पुष्टी करून घेण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आलेआहे.आपली मते किंवा निर्देश फाईलमध्ये लेखी न नोंदविता हवे असलेले काम तोंडी आदेश देऊन करून घेण्याची प्रवृत्ती अलीकडच्या वर्षांमध्ये मंत्र्यांमध्ये रूढ झाल्याचे दिसते. काही अधिकारी, जे काही सांगायचे ते फाईलवर लिहा, असा आग्रह धरतात; पण बऱ्याच वेळा लेखी नोंद न करताच अधिकारी मंत्र्यांच्या इच्छेनुसार कामे पार पाडतात. ‘पीएमओ’ने जारी केलेल्या या ताज्या निदेशांमुळे अशा मंत्र्यांना यापुढे अधिक सावधपणे काम करावे लागणारआहे.या संदर्भात पूर्वीपासूनच लागू असलेल्या; परंतु अभावानेच पालन केल्या जाणाऱ्या कार्यालयीन कामाच्या मॅन्युअलचा संदर्भ देत ‘पीएमओ’ने म्हटले आहे की, जेव्हा कोणाही अधिकाऱ्याला मंत्री किंवा त्यांच्या स्वीय कर्मचाऱ्यांकडून तोंडी निर्देश दिले जातील तेव्हा असे निर्देश नियम वा प्रस्थापित पद्धतीला धरून असले तर संबंधित अधिकाऱ्याने, आपल्या लगेचच्या वरिष्ठाच्या ते निदर्शनास आणून द्यावेत. मात्र मंत्र्यांकडून दिलेले निर्देश नियमांत बसणारे नसतील तर तशी स्पष्ट नोंद करून संबंधित अधिकाऱ्याने ती बाब खात्याच्या सचिवाकडे न्यावी.या सर्वसाधारण नियमास अपवाद करताना मॅन्युअल म्हणते की, मंत्री आजारी किंवा दौऱ्यावर असताना एखाद्या तातडीच्या बाबीत त्यांच्याकडून फोनवरून तोेंडी निर्देश घ्यावे लागले तरी मंत्र्यांचे ते निर्देश त्यांच्या स्वीय सचिवांनी संबंधितांना लेखी कळवावे आणि मंत्री बरे झाल्यावर अथवा दौऱ्यावरून परत आल्यावर त्यांच्याकडून अशा निर्देशाची लेखी पुष्टी घेतलीजावी. (लोकमत न्यूज नेटवर्क)