शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही - मोदी

By admin | Updated: May 27, 2016 04:45 IST

आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची

सहारनपूर (उत्तर प्रदेश) : आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची बातमी तुम्ही कधी ऐकली आहे काय, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे झालेल्या सभेत केला. या वेळी त्यांनी दोन वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान म्हणाले, लाखो लोकांसमोर असा हिशेब देण्याची हिंमत दोन वर्षांपूर्वी नव्हती. कधीकधी मी चकित होतो व जनतेचा पैसा लुटण्यासाठी लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसविले जाते काय, असाही प्रश्न मनात येतो. आमचे सरकार केवळ गरिबांसाठीच काम करणारे आहे. गॅस सिलिंडर आणि शेगडी ही पूर्वी केवळ श्रीमंतांसाठीच होती. गरिबांना लाकूड जाळत चुलीवरच आयुष्य काढावे लागत होते. पण आम्ही गरिबांसाठी धोरण ठरविले. एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी गॅस सबसिडीचा त्याग केला. त्याच आधारावर आम्ही तीन कोटी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस देणार आहोत, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. येत्या १५ जूनपर्यंत मोदी इतरही राज्यांत अशा सभा घेणार आहेत. (वृत्तसंस्था)सर्व सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षेदेशात असलेली डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय संपूर्ण देशात सरसकटपणे ६५ वर्षे करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी येथे केली. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. काही राज्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, तर काही राज्यांत ते ६२ वर्षे आहे. पुरेशी वैद्यकीय महाविद्यालये असती तर डॉक्टरांची संख्याही वाढली असती व आता जाणवतो आहे तसा डॉक्टरांचा तुटवडा जाणवला नसता. दोन वर्षांत डॉक्टर तयार करणे कठीण आहे. परंतु गरिबांना डॉक्टरशिवाय जगण्यास बाध्य केले जाऊ शकत नाही. त्यामुळे याच आठवड्यात आमचे मंत्रिमंडळ निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय घेईल. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनुभवी अध्यापकांच्या सेवांचा लाभ अधिक काळ मिळेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.सर्व समस्यांचे उत्तर केवळ विकासात आहे. आमचे मंत्री देशभरात जातील. आपल्या कामाचा हिशेब देतील. कारण सरकारचे धोरण आणि हेतू दोन्ही स्पष्ट आहेत. देशाचा विकास, गरिबांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू आहे. या विकास यात्रेत जनतेने भागीदार व्हावे. सरकार आमच्यासाठी काय करणार, काय करीत आहे, हे जाणून घेणे हा लोकांचा अधिकार आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान