शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही - मोदी

By admin | Updated: May 27, 2016 04:45 IST

आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची

सहारनपूर (उत्तर प्रदेश) : आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची बातमी तुम्ही कधी ऐकली आहे काय, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे झालेल्या सभेत केला. या वेळी त्यांनी दोन वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान म्हणाले, लाखो लोकांसमोर असा हिशेब देण्याची हिंमत दोन वर्षांपूर्वी नव्हती. कधीकधी मी चकित होतो व जनतेचा पैसा लुटण्यासाठी लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसविले जाते काय, असाही प्रश्न मनात येतो. आमचे सरकार केवळ गरिबांसाठीच काम करणारे आहे. गॅस सिलिंडर आणि शेगडी ही पूर्वी केवळ श्रीमंतांसाठीच होती. गरिबांना लाकूड जाळत चुलीवरच आयुष्य काढावे लागत होते. पण आम्ही गरिबांसाठी धोरण ठरविले. एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी गॅस सबसिडीचा त्याग केला. त्याच आधारावर आम्ही तीन कोटी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस देणार आहोत, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. येत्या १५ जूनपर्यंत मोदी इतरही राज्यांत अशा सभा घेणार आहेत. (वृत्तसंस्था)सर्व सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षेदेशात असलेली डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय संपूर्ण देशात सरसकटपणे ६५ वर्षे करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी येथे केली. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. काही राज्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, तर काही राज्यांत ते ६२ वर्षे आहे. पुरेशी वैद्यकीय महाविद्यालये असती तर डॉक्टरांची संख्याही वाढली असती व आता जाणवतो आहे तसा डॉक्टरांचा तुटवडा जाणवला नसता. दोन वर्षांत डॉक्टर तयार करणे कठीण आहे. परंतु गरिबांना डॉक्टरशिवाय जगण्यास बाध्य केले जाऊ शकत नाही. त्यामुळे याच आठवड्यात आमचे मंत्रिमंडळ निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय घेईल. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनुभवी अध्यापकांच्या सेवांचा लाभ अधिक काळ मिळेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.सर्व समस्यांचे उत्तर केवळ विकासात आहे. आमचे मंत्री देशभरात जातील. आपल्या कामाचा हिशेब देतील. कारण सरकारचे धोरण आणि हेतू दोन्ही स्पष्ट आहेत. देशाचा विकास, गरिबांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू आहे. या विकास यात्रेत जनतेने भागीदार व्हावे. सरकार आमच्यासाठी काय करणार, काय करीत आहे, हे जाणून घेणे हा लोकांचा अधिकार आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान