शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही - मोदी

By admin | Updated: May 27, 2016 04:45 IST

आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची

सहारनपूर (उत्तर प्रदेश) : आमच्या सरकारने दोन वर्षांत एक पैसाही खाल्ला नाही. दोन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराच्या बातम्या झळकत होत्या. देशाचा रुपया लुटण्यात आला. मोदी सरकारने एका रुपयाचा तरी भ्रष्टाचार केल्याची बातमी तुम्ही कधी ऐकली आहे काय, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे झालेल्या सभेत केला. या वेळी त्यांनी दोन वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला. पंतप्रधान म्हणाले, लाखो लोकांसमोर असा हिशेब देण्याची हिंमत दोन वर्षांपूर्वी नव्हती. कधीकधी मी चकित होतो व जनतेचा पैसा लुटण्यासाठी लोकप्रतिनिधींना खुर्चीवर बसविले जाते काय, असाही प्रश्न मनात येतो. आमचे सरकार केवळ गरिबांसाठीच काम करणारे आहे. गॅस सिलिंडर आणि शेगडी ही पूर्वी केवळ श्रीमंतांसाठीच होती. गरिबांना लाकूड जाळत चुलीवरच आयुष्य काढावे लागत होते. पण आम्ही गरिबांसाठी धोरण ठरविले. एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी गॅस सबसिडीचा त्याग केला. त्याच आधारावर आम्ही तीन कोटी गरिबांना स्वयंपाकाचा गॅस देणार आहोत, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले. येत्या १५ जूनपर्यंत मोदी इतरही राज्यांत अशा सभा घेणार आहेत. (वृत्तसंस्था)सर्व सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षेदेशात असलेली डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवेतील डॉक्टरांचे सेवानिवृत्तीचे वय संपूर्ण देशात सरसकटपणे ६५ वर्षे करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी येथे केली. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. काही राज्यांत शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे आहे, तर काही राज्यांत ते ६२ वर्षे आहे. पुरेशी वैद्यकीय महाविद्यालये असती तर डॉक्टरांची संख्याही वाढली असती व आता जाणवतो आहे तसा डॉक्टरांचा तुटवडा जाणवला नसता. दोन वर्षांत डॉक्टर तयार करणे कठीण आहे. परंतु गरिबांना डॉक्टरशिवाय जगण्यास बाध्य केले जाऊ शकत नाही. त्यामुळे याच आठवड्यात आमचे मंत्रिमंडळ निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय घेईल. या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अनुभवी अध्यापकांच्या सेवांचा लाभ अधिक काळ मिळेल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.सर्व समस्यांचे उत्तर केवळ विकासात आहे. आमचे मंत्री देशभरात जातील. आपल्या कामाचा हिशेब देतील. कारण सरकारचे धोरण आणि हेतू दोन्ही स्पष्ट आहेत. देशाचा विकास, गरिबांचे कल्याण हाच आमच्या सरकारचा हेतू आहे. या विकास यात्रेत जनतेने भागीदार व्हावे. सरकार आमच्यासाठी काय करणार, काय करीत आहे, हे जाणून घेणे हा लोकांचा अधिकार आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान