शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

‘डिजिटल इंडिया’ नको, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या!

By admin | Updated: February 22, 2016 01:19 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी

- नितीन अग्रवाल, नवी दिल्लीकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावे, असे भारतीयांना वाटत आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यापेक्षा सरकारने कृषी क्षेत्रास प्राधान्य द्यावे, असे लोकांना वाटते आहे.अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या सर्वेक्षणात चार प्रमुख वर्ग, चार क्षेत्र. समाजाचे चार घटक आणि सरकारी योजनांबाबत लोकांचे मत विचारले गेले होते. अर्थसंकल्पात शेतकरी, युवा व महिला, मध्यमवर्गीय व निम्न वर्ग यापैकी कुणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जायला हवे, असे मंत्रालयाने विचारले होते. सर्वेक्षणात सामील लोकांपैकी सर्वाधिक ५७ टक्के लोकांनी शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. २७ टक्के लोकांनी मध्यमवर्ग, १० टक्के लोकांनी महिला व युवा तसेच ६ टक्के लोकांनी निम्न वर्गास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कृषी उत्पादन व पायाभूत आराखडा, सेवा आणि स्टार्ट-अप्स यातही लोकांनी कृषीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले.मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सुमारे १५,५०० लोकांनी भाग घेतला. शहरी लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या टिष्ट्वटरवर कृषी आणि शेतकरी यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त झाल्याने सरकारलाही धक्का बसला. डिजिटल तंत्राचा वापर करणाऱ्यांंनीच डिजिटल इंडियाबाबत अनास्था दाखवणे, याबाबतही सरकारने आश्चर्य व्यक्त केले.