शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बैल कापू नका, विजेसाठी वापरा!

By admin | Updated: May 16, 2017 06:33 IST

स्वदेशी’चा मूलमंत्र घेत, औषधे आणि सौदर्य प्रसाधनांपासून ते पौष्टिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या उत्पादनाचा १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारत

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘स्वदेशी’चा मूलमंत्र घेत, औषधे आणि सौदर्य प्रसाधनांपासून ते पौष्टिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या उत्पादनाचा १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारत, बहुराष्ट्रीय कंपन्यांना धडकी भरविणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आता गोवंश रक्षणाचाही वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून बैलांची कत्तल करण्याऐवजी त्यांच्या शक्तीचा वापर करून वीजनिर्मिती करण्याच्या एका अभिनव प्रयोगावर कंपनीने संशोधन सुरू केले आहे.बैलांचा वापर करून वीजनिर्मिती हा प्रथमदर्शनी कोणालाही विनोद वाटेल, पण हरिद्वार येथे पतंजलीच्या बैल कापू नका, विजेसाठी वापरा!मुख्यालयात बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या कल्पक पुढाकारातून हे वास्तव साकार होत आहे. भारतातल्या वाहन निर्मिती क्षेत्रातील एक बहुराष्ट्रीय कंपनी तसेच तुर्कस्तानची एक कंपनीही या अभिनव प्रयोगात सहभागी आहे. या प्रकल्पाबाबत एका जाणकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार,एका टर्बाईनव्दारे वीजनिर्मिती करण्याच्या या प्रयोगाला सुरूवातीलाच काही प्रमाणात यश प्राप्त झाले असून साधारणत: २.५ किलोवॅट पर्यंत वीज बैलांच्या शक्तिवर चालवलेल्या टर्बाईनवर तयार करता येते या निष्कर्षाप्रत हे संशोधन पोहोचले आहे. बैलांच्या शक्तिचा वापर करून अधिकाधिक वीजनिर्मिती कशी करता येईल, याचा प्रयत्न पतंजलीने सध्या चालवला आहे.दिवसा नांगरणी, रात्री वीजगोवंशातील जनावरांची विशेषत: बैलांची देशात मोठ्या प्रमाणावर कत्तल होते. पतंजली फूड प्रॉडक्टस कंपनीने या अभिनव प्रयोगाच्या प्राथमिक यशानंतर असा दावा केला आहे की, बैल हा उपयुक्त व शक्तिमान पशू असून, पूर्वीच्या काळी शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर होत असे. कत्तलखान्यात त्याची रवानगी न करता, सकाळी शेतात आणि सायंकाळी वीजनिर्मितीसाठी त्यांचा वापर केल्यास ग्रामीण व दुर्गम भागात जिथे वीज पोहोचली नाही अथवा त्याची टंचाई आहे, तेथील ग्रामीण जनतेला विशेषत: शेतकऱ्यांना या प्रयोगाचा लाभ मिळू शकेल.