शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बैल कापू नका, विजेसाठी वापरा!

By admin | Updated: May 16, 2017 06:33 IST

स्वदेशी’चा मूलमंत्र घेत, औषधे आणि सौदर्य प्रसाधनांपासून ते पौष्टिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या उत्पादनाचा १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारत

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘स्वदेशी’चा मूलमंत्र घेत, औषधे आणि सौदर्य प्रसाधनांपासून ते पौष्टिक खाद्यपदार्थांपर्यंत अनेक वस्तूंच्या उत्पादनाचा १० हजार कोटी रुपयांचा उद्योग उभारत, बहुराष्ट्रीय कंपन्यांना धडकी भरविणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आता गोवंश रक्षणाचाही वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून बैलांची कत्तल करण्याऐवजी त्यांच्या शक्तीचा वापर करून वीजनिर्मिती करण्याच्या एका अभिनव प्रयोगावर कंपनीने संशोधन सुरू केले आहे.बैलांचा वापर करून वीजनिर्मिती हा प्रथमदर्शनी कोणालाही विनोद वाटेल, पण हरिद्वार येथे पतंजलीच्या बैल कापू नका, विजेसाठी वापरा!मुख्यालयात बाबा रामदेव यांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्या कल्पक पुढाकारातून हे वास्तव साकार होत आहे. भारतातल्या वाहन निर्मिती क्षेत्रातील एक बहुराष्ट्रीय कंपनी तसेच तुर्कस्तानची एक कंपनीही या अभिनव प्रयोगात सहभागी आहे. या प्रकल्पाबाबत एका जाणकाराकडून मिळालेल्या माहितीनुसार,एका टर्बाईनव्दारे वीजनिर्मिती करण्याच्या या प्रयोगाला सुरूवातीलाच काही प्रमाणात यश प्राप्त झाले असून साधारणत: २.५ किलोवॅट पर्यंत वीज बैलांच्या शक्तिवर चालवलेल्या टर्बाईनवर तयार करता येते या निष्कर्षाप्रत हे संशोधन पोहोचले आहे. बैलांच्या शक्तिचा वापर करून अधिकाधिक वीजनिर्मिती कशी करता येईल, याचा प्रयत्न पतंजलीने सध्या चालवला आहे.दिवसा नांगरणी, रात्री वीजगोवंशातील जनावरांची विशेषत: बैलांची देशात मोठ्या प्रमाणावर कत्तल होते. पतंजली फूड प्रॉडक्टस कंपनीने या अभिनव प्रयोगाच्या प्राथमिक यशानंतर असा दावा केला आहे की, बैल हा उपयुक्त व शक्तिमान पशू असून, पूर्वीच्या काळी शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीसाठी त्यांचा वापर होत असे. कत्तलखान्यात त्याची रवानगी न करता, सकाळी शेतात आणि सायंकाळी वीजनिर्मितीसाठी त्यांचा वापर केल्यास ग्रामीण व दुर्गम भागात जिथे वीज पोहोचली नाही अथवा त्याची टंचाई आहे, तेथील ग्रामीण जनतेला विशेषत: शेतकऱ्यांना या प्रयोगाचा लाभ मिळू शकेल.