शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

स्मार्ट सिटी चे रूपांतर रावणाच्या लंकेत नको : राज्यपाल सोलंकी

By admin | Updated: September 24, 2015 01:07 IST

एकविसावे शतक विकास आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्वांनाच सुंदर शहरे आणि सर्वांगिण विकास हवा आहे. लोकजीवनाचे रहाणीमान सुधारतांना निसर्ग आणि पर्यावरणाची हानी व्हायला नको

नवी दिल्ली : एकविसावे शतक विकास आणि तंत्रज्ञानाचे शतक आहे. सर्वांनाच सुंदर शहरे आणि सर्वांगिण विकास हवा आहे. लोकजीवनाचे रहाणीमान सुधारतांना निसर्ग आणि पर्यावरणाची हानी व्हायला नको, सुंदर शहरांंबरोबर सुंदर जंगलेही हवीत. स्मार्ट शहरे बनवता बनवता रावणाच्या लंकेची निर्मिती व्हायला नको? सरकारने याची काळजी घ्यायला हवी, असा इशारा हरयाणाचे राज्यपाल कप्तानसिंग सोलंकी यांनी दिला.दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबच्या सभागृहात कल्पक व क्रियाशील मराठी सनदी अधिकारी व हरयाणातल्या जिंद चे उपायुक्त अजित जोशी यांच्या ‘बर्डस आॅफ बिंदावास’ या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळयाचे प्रमुख अतिथी या नात्याने राज्यपाल सोलंकी बोलत होते. सोहळयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांचीही शुभेच्छापर भाषणे झाली.हरयाणाच्या जज्झर जिल्ह्यात बिंदावास पक्षी व वन्यजीवांचे विलक्षण सुंदर अभयारण्य आहे. जज्झरचे जिल्हाधिकारी असतांना अजित जोशींनी बिंदावास अभयारण्याचा कल्पकतेने वेध घेतला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून २६0 प्रकारच्या पक्षांचे आवाज, त्यांच्या वेधक हालचाली व मनोहारी छायाचित्रे त्यांनी टिपली. या कार्यात त्यांना सतिश पांडे, निरंजन संत व प्रमोद देशपांडेंची सक्रीय मदत झाली. बर्डस आॅफ बिंदावास या संग्राह्य पुस्तकाची त्यातूनच निर्मिती झाली.जोशींच्या संकल्पनेची स्तुती करताना जावडेकर म्हणाले, निसर्ग कायम नवनवे पक्षी, नवनव्या वनस्पतींना जन्म देतो, निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. सरकारी फायलीत अडकून न पडता जोशींसारख्या सनदी अधिकाऱ्याने छंद म्हणून त्याचा अचूक वेध घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. जलवायु परिवर्तनाच्या कालखंडात भारतात पर्यावरणाचे रक्षण हे एक आव्हान आहे. ‘बर्डस आॅफ बिंदावास’ हे जोशींचे पुस्तक,वेबसाईट व मोबाईल अ‍ॅप त्या विषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करील. (विशेष प्रतिनिधी)