शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 17, 2014 18:42 IST

नऊ राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - नऊ राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या भाजपाला आधी बिहार व त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान येथील पोटनिवडणुकांत पराभव पत्करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या निकालांपासून धडा घ्या, विजयाचा उन्माद चढू देऊ नका, जे हे ऐकतील तेच महाराष्ट्र काबीज करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेत सध्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. लोकसभेतील यशानंतर भाजपला आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची घाई असून त्यासाठीच ते निम्म्या जागांच्या मागणीसाठी आग्रही आहेत. मात्र लोकसभेत भाजपाला तर विधानसभेत शिवसेनेला अधिक जागा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे असलेले सूत्र शिवसेना बदलण्यास तयार नाही. यामुळे भाजप नेते नाराज असून गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाचा करिश्मा ओसरल्याचे चित्र दिसत आहे. 'लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत' असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला गृहित धरल्यास हीच जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा इशाराही अग्रलेखात देण्यात आला आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
 
- आधी बिहारच्या पोटनिवडणुकांत व आता उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या पोटनिवडणुकांत विचित्र निकाल आहेत. परंपरेने भाजपकडे असलेल्या जागांवर कॉंग्रेस किंवा ‘सपा’ने विजय मिळवावा हे जनमनाचे गूढ म्हणावे लागेल. लोकसभेत ज्याप्रमाणे दुश्मनांचे पोट फाडून भाजप विजयाचा नरसिंह बाहेर आला तसे पोटनिवडणुकांत झाले नाही. 
 
- लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मुसंडी मारणा-या भाजपाला पोटनिवडणुकांत मात्र  यश मिळवता आले नाही. तेथील ११ जागांपैकी ९ समाजवादी पार्टीने तर २ भाजपने जिंकल्या. ‘भाजप’च्या ताब्यातील काही जागांवरही सपाने विजय मिळला. राजस्थानातही भाजपाला जोरदार धक्का बसला असून ४ पैकी ३ जागा कॉंग्रेसने जिंकल्या व १ जागा भाजपला मिळाली. मोदींच्या गुजरातमध्ये ९ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या हे खरे, पण ३ जागा कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतल्या. 
 
- मात्र या निकालांमुळे ‘मोदी लाट ओसरली होऽऽ’ अशा हाकाट्या सुरू झाल्या आहेत. पोटनिवडणुकांचा व मोदी लाटेचा संबंध जोडू नये. लोकसभा निवडणुका वेगळ्या व राज्याच्या निवडणुका वेगळ्या हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीची हवा वेगळी असते व प्रत्येक निकालानंतर हवा बदलत जाते. लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत व विधानसभांच्या निकालांवर जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका लढता येणार नाही. 
 
- लोकांची मने चंचल असतात, त्याचा हा निर्णय आहे. पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल!