शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
3
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
4
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
5
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
6
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
7
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
8
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
9
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
10
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
11
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
12
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
13
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
14
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
15
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
16
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
17
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
18
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
19
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
20
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत

जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 17, 2014 18:42 IST

नऊ राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - नऊ राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या भाजपाला आधी बिहार व त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान येथील पोटनिवडणुकांत पराभव पत्करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या निकालांपासून धडा घ्या, विजयाचा उन्माद चढू देऊ नका, जे हे ऐकतील तेच महाराष्ट्र काबीज करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेत सध्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. लोकसभेतील यशानंतर भाजपला आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची घाई असून त्यासाठीच ते निम्म्या जागांच्या मागणीसाठी आग्रही आहेत. मात्र लोकसभेत भाजपाला तर विधानसभेत शिवसेनेला अधिक जागा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे असलेले सूत्र शिवसेना बदलण्यास तयार नाही. यामुळे भाजप नेते नाराज असून गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाचा करिश्मा ओसरल्याचे चित्र दिसत आहे. 'लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत' असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला गृहित धरल्यास हीच जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा इशाराही अग्रलेखात देण्यात आला आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
 
- आधी बिहारच्या पोटनिवडणुकांत व आता उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या पोटनिवडणुकांत विचित्र निकाल आहेत. परंपरेने भाजपकडे असलेल्या जागांवर कॉंग्रेस किंवा ‘सपा’ने विजय मिळवावा हे जनमनाचे गूढ म्हणावे लागेल. लोकसभेत ज्याप्रमाणे दुश्मनांचे पोट फाडून भाजप विजयाचा नरसिंह बाहेर आला तसे पोटनिवडणुकांत झाले नाही. 
 
- लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मुसंडी मारणा-या भाजपाला पोटनिवडणुकांत मात्र  यश मिळवता आले नाही. तेथील ११ जागांपैकी ९ समाजवादी पार्टीने तर २ भाजपने जिंकल्या. ‘भाजप’च्या ताब्यातील काही जागांवरही सपाने विजय मिळला. राजस्थानातही भाजपाला जोरदार धक्का बसला असून ४ पैकी ३ जागा कॉंग्रेसने जिंकल्या व १ जागा भाजपला मिळाली. मोदींच्या गुजरातमध्ये ९ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या हे खरे, पण ३ जागा कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतल्या. 
 
- मात्र या निकालांमुळे ‘मोदी लाट ओसरली होऽऽ’ अशा हाकाट्या सुरू झाल्या आहेत. पोटनिवडणुकांचा व मोदी लाटेचा संबंध जोडू नये. लोकसभा निवडणुका वेगळ्या व राज्याच्या निवडणुका वेगळ्या हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीची हवा वेगळी असते व प्रत्येक निकालानंतर हवा बदलत जाते. लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत व विधानसभांच्या निकालांवर जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका लढता येणार नाही. 
 
- लोकांची मने चंचल असतात, त्याचा हा निर्णय आहे. पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल!