शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

डीएनए चाचणीतूनच नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल

By admin | Updated: January 25, 2016 01:50 IST

केवळ डीएनए चाचणीद्वारेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधी वादाला पूर्णविराम दिला जाऊ शकतो. पुढील महिन्यात भारत भेटीवर येऊ तेव्हा तशी

नवी दिल्ली : केवळ डीएनए चाचणीद्वारेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधी वादाला पूर्णविराम दिला जाऊ शकतो. पुढील महिन्यात भारत भेटीवर येऊ तेव्हा तशी औपचारिक विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे त्यांच्या कन्या अनिता पाफ यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच केंद्र सरकारने नेताजींसंबंधी फाईल्स खुल्या केल्याबद्दल त्यांनी स्वागत केले.नेताजी बोस यांनी इमिली शेन्कील यांच्यासोबत लग्न केले होते. ७३ वर्षीय अनिता पाफ या त्यांच्या कन्या आहेत. नेताजींच्या अस्थी जपानच्या रेन्कोजी विहारात ठेवण्यात आल्या असून, त्यांची डीएनए चाचणी घेतली जाऊ शकते, असे त्या जर्मनीतील आॅग्सबर्ग येथील आपल्या निवासस्थानी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. नेताजींसंबंधी दस्तऐवजात काही तरी महत्त्वाचे असावे अन्यथा ते ७० वर्षांपेक्षा जास्त काळ गोपनीय श्रेणीत राहिले नसते, असेही त्या म्हणाल्या. १९४५ मध्ये माझे वडील विमान अपघातात मृत्यू पावले या कथनावर मी विश्वास ठेवते, कारण अद्यापही पुराव्यांबाबत स्पष्टता नाही; मात्र मला त्याबाबत आश्चर्य वाटत नाही. कारण तुम्ही तशी अपेक्षा कशी करू शकता? मोठी अनिश्चितता आणि उलथापालथ होत असताना जपानने शरणागती पत्करण्याच्या तीन दिवस आधी हे विमान कोसळले. रेन्कोजी विहारात पुरण्यात आलेल्या हाडांची डीएनए चाचणी केली जाऊ शकते. त्या अस्थी माझ्या वडिलांच्या नसतीलही; पण त्यामुळे त्यांचा मृत्यू विमान अपघात झाल्याच्या कथनाला स्पष्टपणे छेदही देता आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)