शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

डीएनए चाचणीतूनच नेताजींच्या मृत्यूचे रहस्य उलगडेल

By admin | Updated: January 25, 2016 01:50 IST

केवळ डीएनए चाचणीद्वारेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधी वादाला पूर्णविराम दिला जाऊ शकतो. पुढील महिन्यात भारत भेटीवर येऊ तेव्हा तशी

नवी दिल्ली : केवळ डीएनए चाचणीद्वारेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधी वादाला पूर्णविराम दिला जाऊ शकतो. पुढील महिन्यात भारत भेटीवर येऊ तेव्हा तशी औपचारिक विनंती केंद्र सरकारला करणार असल्याचे त्यांच्या कन्या अनिता पाफ यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच केंद्र सरकारने नेताजींसंबंधी फाईल्स खुल्या केल्याबद्दल त्यांनी स्वागत केले.नेताजी बोस यांनी इमिली शेन्कील यांच्यासोबत लग्न केले होते. ७३ वर्षीय अनिता पाफ या त्यांच्या कन्या आहेत. नेताजींच्या अस्थी जपानच्या रेन्कोजी विहारात ठेवण्यात आल्या असून, त्यांची डीएनए चाचणी घेतली जाऊ शकते, असे त्या जर्मनीतील आॅग्सबर्ग येथील आपल्या निवासस्थानी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. नेताजींसंबंधी दस्तऐवजात काही तरी महत्त्वाचे असावे अन्यथा ते ७० वर्षांपेक्षा जास्त काळ गोपनीय श्रेणीत राहिले नसते, असेही त्या म्हणाल्या. १९४५ मध्ये माझे वडील विमान अपघातात मृत्यू पावले या कथनावर मी विश्वास ठेवते, कारण अद्यापही पुराव्यांबाबत स्पष्टता नाही; मात्र मला त्याबाबत आश्चर्य वाटत नाही. कारण तुम्ही तशी अपेक्षा कशी करू शकता? मोठी अनिश्चितता आणि उलथापालथ होत असताना जपानने शरणागती पत्करण्याच्या तीन दिवस आधी हे विमान कोसळले. रेन्कोजी विहारात पुरण्यात आलेल्या हाडांची डीएनए चाचणी केली जाऊ शकते. त्या अस्थी माझ्या वडिलांच्या नसतीलही; पण त्यामुळे त्यांचा मृत्यू विमान अपघात झाल्याच्या कथनाला स्पष्टपणे छेदही देता आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)