शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

ग्रामनिधी कर्जाबाबत ग्रा.पं.ची चौकशी जि.प.चा निर्णय : सदस्य विजय पाटील यांचा सभात्याग

By admin | Updated: January 31, 2016 00:16 IST

जळगाव- जि.प.च्या माध्यमातून ग्रा.पं.ना गत काळात वितरित झालेल्या ग्रामनिधीच्या कर्जाचा विनीयोग योग्य प्रकार झाला आहे की नाही याबाबत चौकशी करण्याचा निर्णय जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत शनिवारी झाला. तसेच ग्रामनिधी कर्जासंबंधी जेथे अनागोंदी आढळेल तेथील ग्रामसेवकास बडतर्फ व सरपंचास अपात्र करण्याचा निर्णयही झाला.

जळगाव- जि.प.च्या माध्यमातून ग्रा.पं.ना गत काळात वितरित झालेल्या ग्रामनिधीच्या कर्जाचा विनीयोग योग्य प्रकार झाला आहे की नाही याबाबत चौकशी करण्याचा निर्णय जि.प.च्या स्थायी समितीच्या सभेत शनिवारी झाला. तसेच ग्रामनिधी कर्जासंबंधी जेथे अनागोंदी आढळेल तेथील ग्रामसेवकास बडतर्फ व सरपंचास अपात्र करण्याचा निर्णयही झाला.
दुपारी साने गुरुजी सभागृहात ही सभा झाली. प्रयाग कोळी अध्यक्षस्थानी होत्या. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती दर्शना घोडेस्वार, सुरेश धनके, मीना पाटील, सदस्य प्रभाकर सोनवणे, विजय पाटील, अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, सीईओ आस्तिककुमार पांडेय आदी उपस्थित होते.

ग्रामनिधीच्या दुरुपयोगाच्या तक्रारी
जिल्हाभरात ५१ ग्रा.पं.च्या ग्राम निधी कर्जाच्या थकबाकीची यादी सभेत सादर करण्यात आली. त्यांचे सुमारे पाच कोटी कर्ज थकले आहे. तसेच या निधीचा उपयोग निर्देशानुसार केला जात नाही, अशा तक्रारी असल्याचे सदस्य अशोक कांडेलकर, प्रकाश सोमवंशी, प्रभाकर सोनवणे आदींनी सांगितले.

सहा महिने कार्यकाळ शिल्लक पंचायतीला नाही मिळणार कर्ज
अनेकदा ग्रा.पं.चा पाच वर्षाचा कार्यकाळ संपण्याच्या काही महिन्यांपूर्वी ग्रामनिधीचे कर्ज घेण्याचे प्रकार होतात. ही बाब लक्षात घेता यापुढे ग्रा.पं.चा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वी कर्ज मागणीचा प्रस्ताव आल्यास तो नाकारावा, असा निर्णय झाला.

थकबाकीदार ग्रा.पं.ना कामे देऊ नका
ज्या ग्रा.पं. आपल्या गावातील आरोग्य केंद्राचे नूतनीकरण, दुरुस्ती व इतर कामे करून घेण्यास सक्षम नसतील त्या ग्रा.पं.ना कामे देऊ नयेत, अशी मागणी सदस्यांनी केली. साकळी ग्रा.पं.च्या आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा मुद्दाही यानिमित्त समोर आला. त्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली.

अभियंत्याची चौकशी व बदली
सदस्य विजय पाटील यांनी चोपडा येथील बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजू बेहरे यांच्याबाबत २०१२ पासून तक्रारी आहेत. पण चौकशी केली जात नाही, असा आरोप केला. त्यास इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. यानंतर बेहरे यांची चौकशी करण्यासह त्यांची चोपडा तालुक्यातून इतरत्र बदली करण्याचा निर्णय झाला.

व्यापारी गाळ्यांचे बेकायदेशीर हस्तांतरण
ग्रामसमृद्धी योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे अपंग बांधवांना गाळे दिले, पण हे गाळे संबंधितांनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केले. पैशांचे व्यवहार झाले. यामुळे या योजनेचा उद्देश सफल झालेला नाही. याची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली.