शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

यंदा जिल्ह्यात ४६०६ मिमी कमी पाऊस

By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
ठाणे : ठाणे हा अतिपावसाचा जिल्हा म्हणून संबोधला जात असताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४,६०६ मिमी पाऊस कमी पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणी साठा कमी झाला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी आजच्या दिनांकापर्यंत १६८६८.५४ मिमी पाऊस पडला होता. सरासरी २४०९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत १२ हजार २६२.७५ मिमी पाऊस पडला असून या पावसाची सरासरी एक हजार ७५१.८२ मिमी नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात ४,६०६ मिमी म्हणजे सरासरी ६५८.१५ मिमी कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात १९२५.६० मिमी पडला आहे. सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी २५४८.८० मिमी पाऊस पडला होता. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यात १८८४ मिमी तर या खालोखाल कल्याण १८१७.५० मिमी, उल्हासनगर १७४१.७४, शहापूर १७१८.२०, अंबरनाथ १६५५.२१ आणि मुरबाडला सर्वात कमी १५२०.५० मिमी पाऊस पडला असून येथे कमी पावसाची नोंद असली तरी या कालावधीत वादळ-वार्‍यापासून सर्वाधिक नुकसान मुरबाडमध्येच झाल्याचे निदर्शनात आले आहे. (प्रतिनिधी)