शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
3
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
4
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
5
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
6
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
7
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
8
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
9
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा नावं
10
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
11
"४ लाख महिलांवर गँगरेप, स्वत:च्याच लोकांवर बॉम्बस्फोट.."; UN मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं
12
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...
13
समंथाशी घटस्फोटानंतर कशी झाली शोभिताची एन्ट्री? नागा चैतन्यने अख्खी लव्हस्टोरी सांगितली
14
Gold Silver Price: ₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या
15
विवाहित गर्लफ्रेंडला संपवलं, घरातच पुरलं अन् त्यावर खाट ठेवून झोपत होता प्रियकर! कसा पकडला गेला?
16
आठवड्याची सुरुवात गजकेसरी योगाने; करिअर, कमाईत ६ राशींना मिळणार भरघोस फायदे!
17
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट 'जावेद हबीब' अडचणीत! आतापर्यंत २० एफआयआर, पोलिसांनी कारवाई सुरू केली; नेमकं प्रकरण काय?
18
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
19
"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट
20
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

टंचाई निवारणासाठी अधिकारात वाढ जिल्हाधिकारी : हतनूरच्या धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासाठी ड्रेझर मागविणार

By admin | Updated: May 11, 2016 00:24 IST

जळगाव : नागरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिती निवारणासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात वाढ केली आहे. अमळनेर व यावल तालुक्यांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी हतनूरच्या धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ड्रेझर मागविण्यात येणार आहे.

जळगाव : नागरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिती निवारणासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात वाढ केली आहे. अमळनेर व यावल तालुक्यांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी हतनूरच्या धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ड्रेझर मागविण्यात येणार आहे.
...तर जिल्हाधिकारी पाणी टंचाई जाहीर करतील
ग्रामीण भागातील संबंधित गावाच्या एक किलोमीटर परिसरातील सार्वजनिक उद्भवातून दर दिवशी २० लीटर्स पेक्षा कमी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकार्‍यांना असलेल्या अधिकारानुसार पाण्याची टंचाई जाहीर करता येणार आहे.
ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई परिस्थिती निवारणासाठी घेण्यात येणार्‍या उपाययोजनांमध्ये धरणामध्ये अथवा तलावामध्ये चर खोदण्याची उपाययोजना करण्यात येणार आहे. नागरिकांना पेयजल उपलब्ध व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे.
हतनूर धरणागातील गाळ काढण्यासाठी उपाययोजना
सध्या अमळनेर व यावल तालुक्याचे हतनूरच्या पाण्यावर आरक्षण आहे. या तालुक्यांना आवर्तन सोडण्यासाठी धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासाठी मुंबईवरून ड्रेझर मागविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. गाळ काढल्यानंतर या दोन्ही तालुक्यांना आवर्तन सोडणे सुलभ होणार आहे.

वित्तीय मर्यादेत केली वाढ
पाणी टंचाईच्या निवारणासाठी उपाययोजनांच्या प्रशासकीय मंजुरी देण्यासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या वित्तीय मर्यादेत वाढ केली आहे. त्यात तात्पुरती पूरक नळ पाणी योजनेचे जिल्हाधिकार्‍यांना २० लाख तर विभागीय आयुक्तांना ५० लाखांपर्यंत अधिकार आहे. नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी ३० लाख विभागीय आयुक्त ५० लाख, जुन्या विहिरीची दुरुस्ती, विहीर खोल करणे, पुनरुर्जीवित करणे यासाठी जिल्हाधिकारी दोन लाख, विभागीय आयुक्तांना तीन लाख, धरण किंवा तलावामध्ये चर खोदण्यासाठी जिल्हाधिकारी ५ लाख व विभागीय आयुक्तांना दहा लाख, पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्यासाठी आवश्यक तात्पुरती उपाययोजनेसाठी जिल्हाधिकार्‍यांना ५० हजार तर विभागीय आयुक्तांना एक लाख रुपये मंजुरीचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे.