शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला वाघूर धरणाच्या विहिरीतून पाणी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारींना निवेदन : अन्यथा प्रशासनासमोर उपोषण

By admin | Updated: July 27, 2016 22:10 IST

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभाग व वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, सदर विहिरींची आवक चाचणी करण्यात आली असून मुबलक पाणी असल्याचा अहवाल सहाय्यक भूवैज्ञानिक ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषद यांनी दिला आहे. वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर प्रकल्पासाठी लागणारा खर्च ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्वत: करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पाणीटंचाई मुक्त होऊन शुद्ध व मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळणार आहे. सदरचा पाणीपुरवठा गुरुत्वबलाद्वारे करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार आहे. विजेसाठी होणारा खर्च इतरत्र विकास कामांवर करता येणे शक्य होईल.
प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी अन्यथा ८ ते १० दिवसानंतर प्रशासनासमोर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.

सरपंच खिलचंद रोटे, दगडू माळी, धनंजय चौधरी, ललित बर्‍हाटे, राहुल नारखेडे, किशोर बोंडे आदींनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले त्यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक यांनाही माहितीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.