शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादला वाघूर धरणाच्या विहिरीतून पाणी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारींना निवेदन : अन्यथा प्रशासनासमोर उपोषण

By admin | Updated: July 27, 2016 22:10 IST

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभाग व वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, सदर विहिरींची आवक चाचणी करण्यात आली असून मुबलक पाणी असल्याचा अहवाल सहाय्यक भूवैज्ञानिक ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषद यांनी दिला आहे. वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर प्रकल्पासाठी लागणारा खर्च ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्वत: करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पाणीटंचाई मुक्त होऊन शुद्ध व मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळणार आहे. सदरचा पाणीपुरवठा गुरुत्वबलाद्वारे करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार आहे. विजेसाठी होणारा खर्च इतरत्र विकास कामांवर करता येणे शक्य होईल.
प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी अन्यथा ८ ते १० दिवसानंतर प्रशासनासमोर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.

सरपंच खिलचंद रोटे, दगडू माळी, धनंजय चौधरी, ललित बर्‍हाटे, राहुल नारखेडे, किशोर बोंडे आदींनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले त्यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक यांनाही माहितीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.