शहरं
Join us  
Trending Stories
1
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
2
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मध्यस्थीसाठी विनंती
3
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
4
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
5
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
6
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
7
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
8
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
9
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
10
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
11
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
12
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
13
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
14
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
15
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
16
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
17
CSK स्टार मुरली विजय दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
18
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
19
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
20
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?

नशिराबादला वाघूर धरणाच्या विहिरीतून पाणी मिळण्याची मागणी जिल्हाधिकारींना निवेदन : अन्यथा प्रशासनासमोर उपोषण

By admin | Updated: July 27, 2016 22:10 IST

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.

नशिराबाद : येथे गेल्या २५ ये ३० वर्षांपासून पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहे. कायमस्वरूपी ठोस पर्यायी योजनाच नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यावर मात करण्यासाठी व कायमस्वरूपी पाणी योजनेसाठी वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभागाच्या वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना बुधवार दि.२७ जुलैरोजी निवेदन देण्यात आले. दहा दिवसात याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास जिल्हा प्रशासनासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा सरपंच खिलचंद रोटे यांनी निवेदनात नमूद केला आहे.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने वाघूर धरणाच्या खालील बाजूस असलेल्या सिंचन विभाग व वाघूर धरणाच्या विहिरीवरून पाणी मिळण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, सदर विहिरींची आवक चाचणी करण्यात आली असून मुबलक पाणी असल्याचा अहवाल सहाय्यक भूवैज्ञानिक ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषद यांनी दिला आहे. वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सदर प्रकल्पासाठी लागणारा खर्च ग्रामपंचायत १४ व्या वित्त आयोगांतर्गत स्वत: करण्याच्या तयारीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे पाणीटंचाई मुक्त होऊन शुद्ध व मुबलक पाणी ग्रामस्थांना मिळणार आहे. सदरचा पाणीपुरवठा गुरुत्वबलाद्वारे करण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार आहे. विजेसाठी होणारा खर्च इतरत्र विकास कामांवर करता येणे शक्य होईल.
प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घ्यावी अन्यथा ८ ते १० दिवसानंतर प्रशासनासमोर सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपोषण करतील असा इशारा देण्यात आला आहे.

सरपंच खिलचंद रोटे, दगडू माळी, धनंजय चौधरी, ललित बर्‍हाटे, राहुल नारखेडे, किशोर बोंडे आदींनी जिल्हाधिकारींना निवेदन दिले त्यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक यांनाही माहितीस्तव निवेदन पाठविण्यात आले आहे.