शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

जिल्हा बँकेची ९३० कोटींची थकबाकी ३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत : सचिवांमार्फत दिली थकबाकीदारांना नोटीस

By admin | Updated: October 18, 2016 00:37 IST

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.
तीन वर्षात वसुलीत २३.२७ टक्के घट
शेतकर्‍यांची बँक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत खरीप व रब्बी हंगामात अल्प, मध्यम मुदतीचे पीककर्ज,पगारदार कर्मचारी, स्वयंसाहाय्यता बचत गट, जॉईंट लायबिलीट ग्रुप यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१३/१४ मध्ये १५०५ कोटी ४६ लाखांची सन २०१४/१५ मध्ये १७३६ कोटी २७ लाख तर सन २०१५/१६ मध्ये १९४१ कोटी ६४ लाखांची रक्कमेच्या कर्जाची वसुलीस पात्र होती. त्यापैकी २०१३/१४ मध्ये ७९.२९ टक्के, २०१४/१५ मध्ये ७१.२९ तर २०१५/१६ मध्ये ४८.०२ टक्के वसुली झाली आहे. या तीन वर्षांमध्ये कर्जवसुलीत तब्बल २३.२७ टक्क्यांची घट झाली आहे.
सचिवांमार्फत दिली नोटीस
थकबाकीची रक्कम वाढत असल्याने जिल्हा बँकेने आता कर्जवसुलीला वेग दिला आहे. थकित कर्जाचा भरणा करण्यासाठी जिल्हा बँक तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांमार्फत कर्जदारांना नोटीस देण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत
कर्जदारांनी थकित रकमेचा भरणा तत्काळ करावा यासाठी जिल्हा बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत थकबाकी भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे असे आवाहन केले आहे. ३० नोव्हेंबरनंतर थकित कर्जदारांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
धरणगाव, रावेर,भडगाव तालुक्यात सर्वाधिक थकबाकी
धरणगाव तालुक्यातील कर्जाच्या वसुलीत तब्बल ५४.४७ टक्के घट झाली आहे. त्या पाठोपाठ रावेर तालुक्यात ४२.३६ तर भडगाव तालुक्यात ४१.४० टक्के कर्जवसुलीत घट झाली आहे.


कोट
गेल्या वर्षी असलेली दुष्काळीस्थिती, शासनाने कर्जवसुलीला केलेली बंदी यामुळे कर्जाची थकबाकी ही ९३० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. कर्जदारांनी थकबाकीची रक्कम भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे.
जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक.