शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची ९३० कोटींची थकबाकी ३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत : सचिवांमार्फत दिली थकबाकीदारांना नोटीस

By admin | Updated: October 18, 2016 00:37 IST

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.
तीन वर्षात वसुलीत २३.२७ टक्के घट
शेतकर्‍यांची बँक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत खरीप व रब्बी हंगामात अल्प, मध्यम मुदतीचे पीककर्ज,पगारदार कर्मचारी, स्वयंसाहाय्यता बचत गट, जॉईंट लायबिलीट ग्रुप यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१३/१४ मध्ये १५०५ कोटी ४६ लाखांची सन २०१४/१५ मध्ये १७३६ कोटी २७ लाख तर सन २०१५/१६ मध्ये १९४१ कोटी ६४ लाखांची रक्कमेच्या कर्जाची वसुलीस पात्र होती. त्यापैकी २०१३/१४ मध्ये ७९.२९ टक्के, २०१४/१५ मध्ये ७१.२९ तर २०१५/१६ मध्ये ४८.०२ टक्के वसुली झाली आहे. या तीन वर्षांमध्ये कर्जवसुलीत तब्बल २३.२७ टक्क्यांची घट झाली आहे.
सचिवांमार्फत दिली नोटीस
थकबाकीची रक्कम वाढत असल्याने जिल्हा बँकेने आता कर्जवसुलीला वेग दिला आहे. थकित कर्जाचा भरणा करण्यासाठी जिल्हा बँक तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांमार्फत कर्जदारांना नोटीस देण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत
कर्जदारांनी थकित रकमेचा भरणा तत्काळ करावा यासाठी जिल्हा बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत थकबाकी भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे असे आवाहन केले आहे. ३० नोव्हेंबरनंतर थकित कर्जदारांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
धरणगाव, रावेर,भडगाव तालुक्यात सर्वाधिक थकबाकी
धरणगाव तालुक्यातील कर्जाच्या वसुलीत तब्बल ५४.४७ टक्के घट झाली आहे. त्या पाठोपाठ रावेर तालुक्यात ४२.३६ तर भडगाव तालुक्यात ४१.४० टक्के कर्जवसुलीत घट झाली आहे.


कोट
गेल्या वर्षी असलेली दुष्काळीस्थिती, शासनाने कर्जवसुलीला केलेली बंदी यामुळे कर्जाची थकबाकी ही ९३० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. कर्जदारांनी थकबाकीची रक्कम भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे.
जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक.