शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची ९३० कोटींची थकबाकी ३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत : सचिवांमार्फत दिली थकबाकीदारांना नोटीस

By admin | Updated: October 18, 2016 00:37 IST

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.

जळगाव : दुष्काळीस्थिती, शासनाकडून कर्जवसुलीला बंदी या कारणांमुळे जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचा वेग कमी झाला आहे. जिल्हा बँकेचे तब्बल ९३० कोटींचे कर्ज थकीत असल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकीदारांनी कर्जाची रक्कम भरावी या आशयाची नोटीस सचिवांमार्फत कर्जदारांना देण्यात आली आहे.
तीन वर्षात वसुलीत २३.२७ टक्के घट
शेतकर्‍यांची बँक असलेल्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत खरीप व रब्बी हंगामात अल्प, मध्यम मुदतीचे पीककर्ज,पगारदार कर्मचारी, स्वयंसाहाय्यता बचत गट, जॉईंट लायबिलीट ग्रुप यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. सन २०१३/१४ मध्ये १५०५ कोटी ४६ लाखांची सन २०१४/१५ मध्ये १७३६ कोटी २७ लाख तर सन २०१५/१६ मध्ये १९४१ कोटी ६४ लाखांची रक्कमेच्या कर्जाची वसुलीस पात्र होती. त्यापैकी २०१३/१४ मध्ये ७९.२९ टक्के, २०१४/१५ मध्ये ७१.२९ तर २०१५/१६ मध्ये ४८.०२ टक्के वसुली झाली आहे. या तीन वर्षांमध्ये कर्जवसुलीत तब्बल २३.२७ टक्क्यांची घट झाली आहे.
सचिवांमार्फत दिली नोटीस
थकबाकीची रक्कम वाढत असल्याने जिल्हा बँकेने आता कर्जवसुलीला वेग दिला आहे. थकित कर्जाचा भरणा करण्यासाठी जिल्हा बँक तसेच विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांमार्फत कर्जदारांना नोटीस देण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत दिली मुदत
कर्जदारांनी थकित रकमेचा भरणा तत्काळ करावा यासाठी जिल्हा बँकेने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत थकबाकी भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे असे आवाहन केले आहे. ३० नोव्हेंबरनंतर थकित कर्जदारांची नावे वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
धरणगाव, रावेर,भडगाव तालुक्यात सर्वाधिक थकबाकी
धरणगाव तालुक्यातील कर्जाच्या वसुलीत तब्बल ५४.४७ टक्के घट झाली आहे. त्या पाठोपाठ रावेर तालुक्यात ४२.३६ तर भडगाव तालुक्यात ४१.४० टक्के कर्जवसुलीत घट झाली आहे.


कोट
गेल्या वर्षी असलेली दुष्काळीस्थिती, शासनाने कर्जवसुलीला केलेली बंदी यामुळे कर्जाची थकबाकी ही ९३० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. कर्जदारांनी थकबाकीची रक्कम भरून नवीन कर्जासाठी पात्र व्हावे.
जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जिल्हा बँक.