शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणुकीसाठी कर्जतमध्ये मोर्चेबांधणी

By admin | Updated: April 20, 2015 13:11 IST

कर्जत : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेत, श्रेष्ठींशी संवाद साधत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्रेष्ठी कोणाला हिरवा कंदील देतात, या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

कर्जत : अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेत, श्रेष्ठींशी संवाद साधत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. श्रेष्ठी कोणाला हिरवा कंदील देतात, या निर्णयाकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी विक्रमसिंह देशमुख, आंबादास पिसाळ, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंके, काकासाहेब तापकीर, महेंद्र गुंड, ॲड. शिवाजीराव अनभुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक बापूसाहेब देशमुख यांनी यावेळी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे नातू विक्रमसिंह देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली. बापूसाहेब देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्या विरोधकांनी कंबर कसली आहे. एकास एक लढत व्हावी, यासाठी कोणता उमेदवार सक्षम राहील, कोणाच्या नावावर एकमत करायचे, यासाठी बैठका झाल्या. बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी माजी मंत्र्यांसमोर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन केले. देशमुख हे थोरात यांच्या पॅनलमधून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. देशमुख विरोधी गटाची बैठक एकत्रित अहमदनगर येथे पार पडली. या बैठकीत उमेदवारीबाबत चाचपणी झाली. परंतु श्रेष्ठी काय निर्णय घेतात, यावरच येऊन सर्व थांबले.कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाक्षी साळुंके यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. त्यांना महिला मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांच्या पॅनलमधून उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा कर्जतकरांना आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन संपर्क वाढवला आहे. सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी कोणत्या पॅनलची कोणाला मिळतेय, याबाबत अद्याप अनिश्चितता असली तरी सर्वांनीच निवडणुकीची तयारी जोमाने सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.