शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

१९ गावांमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित १० हजार कुटुंबांना भूखंड वाटप : हतनूर व पाडळसे प्रकल्पातील सर्वाधिक गावठाणे

By admin | Updated: December 9, 2015 23:55 IST

जळगाव : जिल्‘ात राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.

जळगाव : जिल्‘ात राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
जिल्‘ात सात प्रकल्पातील पुनर्वसनाची गरज
जिल्‘ात सद्यस्थितीला हतनूर प्रकल्प, बोरी प्रकल्प, हिवरा प्रकल्प, बहुळा प्रकल्प, निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, वाघूर प्रकल्प, अंजनी प्रकल्प, अंजनी जलाशयाची क्षमता वाढविणे तसेच गिरणा मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे.
१३ हजार कुटुंब प्रकल्पग्रस्त
सातही प्रकल्पांच्या निमित्ताने १२ हजार ८५५ कुटुंबांना फटका बसला आहे. या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात सर्वाधिक सात हजार १२३ कुटुंब ही हतनूर प्रकल्पांतर्गत आहेत. तर त्या पाठोपाठ निम्न तापी प्रकल्प पाडळसे या अंतर्गत दोन हजार ११७ कुटुंब आहेत. तर वाघूर प्रकल्पांतर्गत दोन हजार ५१ कुटुंबांचा समावेश आहे.
१० हजार कुटुंबाना भूखंडाचे वाटप
जिल्‘ात या सात प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनाचे काम सुरू असताना जिल्हा प्रशासनाने दहा हजार ८७ कुटुंबांना भूखंडाचे वाटप केले आहे. मात्र अजूनही दोन हजार ७५८ प्रकल्पग्रस्त कुटुंबाना भूखंडाची प्रतीक्षा आहे. त्यापैकी गिरणा मध्यम प्रकल्प नाशिक अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मौजे विसापूर तांडा हे गाव बाधित झाले होते. या गावाचे पुनर्वसन नाशिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी
एरंडोल तालुक्यातील अंजनी जलाशयाची क्षमता वाढविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. उंचीवाढनुसार भूसंपादन व पुनर्वसन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत शासनस्तरावर प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकल्पातील ६९६ प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडवाटपावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
५५ वर्षांपासून सुरू आहे संघर्ष
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील २२ पूरग्रस्त गावातील शेकडो नागरिकांचे पुनर्वसन झाल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी जमिनी मिळाल्या, त्या नावावर करून घेण्यासाठी तब्बल ५५ वर्षापासून त्यांना संघर्ष करावा लागतोय. १९५९ साली या २२ गावामंध्ये महापूर आला होता. त्यानंतर येथील ग्रामस्थांचे पुनवर्सन झाले होते. मात्र, त्यांना मिळालेल्या जमिनी अद्यापही त्यांच्या नावावर नाहीत. त्यानुसार तहसीलदारांनी संबंधित गावांमध्ये जाऊन अहवाल तयार करून येथील ग्रामस्थांचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे आदेश ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले होते.