शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
3
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
4
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
5
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
7
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
8
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
9
"हे देवा, त्यांनी आता बोलणं थांबवावं", डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत सनी लिओनीचं स्पष्ट मत, म्हणाली- "त्यांच्या काही गोष्टी..."
10
Turkey Earthquake: तुर्कीत ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप, २० सेकंदाचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
11
जुही बब्बरने भावाला बांधली राखी, प्रतीक बब्बरची अनुपस्थिती; भावुक पोस्ट करत म्हणाली...
12
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
13
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
14
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
15
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
16
NSDL Share Price: 'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
17
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
18
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
19
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
20
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!

१९ गावांमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित १० हजार कुटुंबांना भूखंड वाटप : हतनूर व पाडळसे प्रकल्पातील सर्वाधिक गावठाणे

By admin | Updated: December 9, 2015 23:55 IST

जळगाव : जिल्‘ात राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.

जळगाव : जिल्‘ात राबविण्यात येणार्‍या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
जिल्‘ात सात प्रकल्पातील पुनर्वसनाची गरज
जिल्‘ात सद्यस्थितीला हतनूर प्रकल्प, बोरी प्रकल्प, हिवरा प्रकल्प, बहुळा प्रकल्प, निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, वाघूर प्रकल्प, अंजनी प्रकल्प, अंजनी जलाशयाची क्षमता वाढविणे तसेच गिरणा मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे.
१३ हजार कुटुंब प्रकल्पग्रस्त
सातही प्रकल्पांच्या निमित्ताने १२ हजार ८५५ कुटुंबांना फटका बसला आहे. या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात सर्वाधिक सात हजार १२३ कुटुंब ही हतनूर प्रकल्पांतर्गत आहेत. तर त्या पाठोपाठ निम्न तापी प्रकल्प पाडळसे या अंतर्गत दोन हजार ११७ कुटुंब आहेत. तर वाघूर प्रकल्पांतर्गत दोन हजार ५१ कुटुंबांचा समावेश आहे.
१० हजार कुटुंबाना भूखंडाचे वाटप
जिल्‘ात या सात प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनाचे काम सुरू असताना जिल्हा प्रशासनाने दहा हजार ८७ कुटुंबांना भूखंडाचे वाटप केले आहे. मात्र अजूनही दोन हजार ७५८ प्रकल्पग्रस्त कुटुंबाना भूखंडाची प्रतीक्षा आहे. त्यापैकी गिरणा मध्यम प्रकल्प नाशिक अंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील मौजे विसापूर तांडा हे गाव बाधित झाले होते. या गावाचे पुनर्वसन नाशिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंजनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन बाकी
एरंडोल तालुक्यातील अंजनी जलाशयाची क्षमता वाढविण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. उंचीवाढनुसार भूसंपादन व पुनर्वसन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत शासनस्तरावर प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रकल्पातील ६९६ प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडवाटपावर निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
५५ वर्षांपासून सुरू आहे संघर्ष
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील २२ पूरग्रस्त गावातील शेकडो नागरिकांचे पुनर्वसन झाल्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी जमिनी मिळाल्या, त्या नावावर करून घेण्यासाठी तब्बल ५५ वर्षापासून त्यांना संघर्ष करावा लागतोय. १९५९ साली या २२ गावामंध्ये महापूर आला होता. त्यानंतर येथील ग्रामस्थांचे पुनवर्सन झाले होते. मात्र, त्यांना मिळालेल्या जमिनी अद्यापही त्यांच्या नावावर नाहीत. त्यानुसार तहसीलदारांनी संबंधित गावांमध्ये जाऊन अहवाल तयार करून येथील ग्रामस्थांचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे आदेश ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आढावा बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिले होते.