शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

डासमुक्ती अभियानात बीडीओंचा निरुत्साह

By admin | Updated: March 14, 2016 00:44 IST

बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाच तालुक्यांमध्ये कामे थंडावली आहेत.पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खास बीडसाठी ५० शोषखड्ड्यांसाठी एकच कार्यारंभ आदेश मंजूर करून घेतला. त्यानंतर शोषखड्डे खोदण्याच्या कामाला अनेक गावांमध्ये गतीही मिळाली होती. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे हे अभियान थंडावण्याच्या मार्गावर आहे. बीड, केज, धारूर, आष्टी, माजलगाव या तालुक्यांमध्ये तर अतिशय उदासीनता असल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाई, परळी, शिरूर कासार या तालुक्यांमध्ये मात्र शोषखड्डे खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. एका शोषखड्ड्यासाठी २१०० रूपयापर्यंतचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सांडपाणी मुरविण्याबरोबरच डासांनाही हद्दपार करणारी ही अनोखी योजना आहे. नांदेड जिल्ह्याचा पॅटर्न उचलून जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प नुकताच पालकमंत्री मुंडे यांनी केला होता. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांकडून असहकार्य असल्याने कामे धिम्या गतीने सुरू आहेत.अन्यथा कारवाईचा बडगाडासमुक्तीसाठी अनेक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्र्यांनी ही योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे. त्याचा लाभ सामान्यांना मिळवून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. या कामात असहकार्य करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जातील, असे जि. प. च्या रो.ह.यो. कक्षाचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी सांगितले. कामात हलगर्जी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)