शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

डासमुक्ती अभियानात बीडीओंचा निरुत्साह

By admin | Updated: March 14, 2016 00:44 IST

बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत सुरू झालेल्या डासमुक्ती अभियानात काही गटविकास अधिकाऱ्यांचा निरूत्साह असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाच तालुक्यांमध्ये कामे थंडावली आहेत.पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खास बीडसाठी ५० शोषखड्ड्यांसाठी एकच कार्यारंभ आदेश मंजूर करून घेतला. त्यानंतर शोषखड्डे खोदण्याच्या कामाला अनेक गावांमध्ये गतीही मिळाली होती. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे हे अभियान थंडावण्याच्या मार्गावर आहे. बीड, केज, धारूर, आष्टी, माजलगाव या तालुक्यांमध्ये तर अतिशय उदासीनता असल्याचे समोर आले आहे. अंबाजोगाई, परळी, शिरूर कासार या तालुक्यांमध्ये मात्र शोषखड्डे खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. एका शोषखड्ड्यासाठी २१०० रूपयापर्यंतचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. सांडपाणी मुरविण्याबरोबरच डासांनाही हद्दपार करणारी ही अनोखी योजना आहे. नांदेड जिल्ह्याचा पॅटर्न उचलून जिल्हा डासमुक्त करण्याचा संकल्प नुकताच पालकमंत्री मुंडे यांनी केला होता. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांकडून असहकार्य असल्याने कामे धिम्या गतीने सुरू आहेत.अन्यथा कारवाईचा बडगाडासमुक्तीसाठी अनेक गावांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पालकमंत्र्यांनी ही योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे. त्याचा लाभ सामान्यांना मिळवून देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. या कामात असहकार्य करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जातील, असे जि. प. च्या रो.ह.यो. कक्षाचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांनी सांगितले. कामात हलगर्जी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)