शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढा

By admin | Updated: February 23, 2016 00:03 IST

जळगाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्‍या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात दुर्दैवाने असा प्रकार घडलाच; तर त्याला खतपाणी घालणार्‍यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.

जळगाव : किरकोळ कारणांवरून उद्भवणारे वाद, तंटे विकोपाला जाऊन सार्वजनिक शांततेला गालबोट लागते. त्यामुळे होणार्‍या गंभीर स्वरुपाच्या परिणामांचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून असे वाद, तंटे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी प्रतिष्ठीत नागरिकांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात दुर्दैवाने असा प्रकार घडलाच; तर त्याला खतपाणी घालणार्‍यांविषयी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
शनिपेठ भागात रविवारी रात्री घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी केले. या बैठकीला शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गफ्फार मलीक, माजी उपमहापौर करीम सालार, बि˜ू सालार, आत्माराम ढंढोरे, आरिफ देशमुख, अब्दूल मिर्झा, मोहन तिवारी, शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, चेतन संकेत, मुकुंद सपकाळे, याकूब खान मुश्ताक खान, गोयल, शेख हारून शेख नूर, कयूम शेख, मिर्झा अब्दूल यांच्यासह शनिपेठ परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
रविवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर शनिपेठ भागात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही गटातील सदस्यांनी सामंजस्याची भूमिका घेऊन हा वाद त्वरित निकाली काढावा; तो पुढे वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. भविष्यातही परिसरात शांतता टिकून राहिल, यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक शांततेला कुणी मुद्दाम गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला. त्याचप्रमाणे हा वाद पुढे वाढणार नाही, अशी ग्वाही बैठकीत शांतता समितीच्या सदस्यांनी दिली.
दुसर्‍या दिवशी तणावपूर्ण शांतता
रविवारी घडलेल्या प्रकारानंतर सोमवारी शनिपेठ भागात दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. दुपारी १२ वाजेनंतर हळहळू येथील परिस्थिती पूर्वपदावर आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने शनिपेठ भागात ठिकठिकाणच्या पॉइन्टवर बंदोबस्त कायम ठेवला होता. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलिसांकडून दिवसभर पेट्रोलिंग सुरू होती.
कोट
दंगलीतील १२ आरोपींना अटक असून उर्वरित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्तही कायम आहे. शांतता टिकून रहावी, यासाठी शांतता समितीची बैठक घेतली. फरार आरोपींनादेखील अटक होईल.
-आत्माराम प्रधान, पोलीस निरीक्षक, शनिपेठ, पोलीस ठाणे.