शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

वादग्रस्त विधेयक चिकित्सा समितीकडे, राजस्थान सरकारची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 04:21 IST

जयपूर : काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि विविध स्तरांतून होत असलेल्या प्रखर विरोधापुढे माघार घेत, राजस्थान सरकारने अखेर वादग्रस्त फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या चिकित्सा (प्रवर) समितीकडे वर्ग केले आहे.

जयपूर : काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि विविध स्तरांतून होत असलेल्या प्रखर विरोधापुढे माघार घेत, राजस्थान सरकारने अखेर वादग्रस्त फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या चिकित्सा (प्रवर) समितीकडे वर्ग केले आहे. ७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या वटहुकमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सोमवारी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी विरोधाला न जुमानता हे विधेयक विधानसभेत मांडले होते. प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच विधिमंडळ कामकाजमंत्री राजेंद्र राठौर यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी रात्री या विधेयकाबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांशी चर्चा केली. त्यावर गृहमंत्री निवेदन देतील.त्यानंतर, गृहमंत्री कटारिया यांनी सभागृहात सांगितले की, सप्टेंबरमध्ये हा वटहुकूम जारी करण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यात आली होती. त्यावर अपक्ष आमदार माणिक चंद सुराणा म्हणाले की, या वटहुकमाची जागा घेणारे दुरुस्ती विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी घेणे जरूरी होते, हा खरा मुद्दा आहे. तेवढ्यात विरोधी आमदारांनी अध्यक्षांच्या आसनापुढे जमा होत विधेयक मागे घेण्याची मागणी करीत गोंधळ घातला. त्यावर कटारिया म्हणाले की, सदस्यांनी केलेल्या सूचनांवर सरकार विचार करेल. त्यानंतर, त्यांनी हे विधेयक चिकित्सा समितीकडे वर्ग करण्याचा ठराव मांडला. सभागृहाने हा ठराव संमत केला. या समितीला पुढच्या अधिवेशनात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.हे वादग्रस्त विधेयक चिकित्सा समितीकडे वर्ग करण्याचा ठराव संमत झाल्यानंतर, अध्यक्षांनी इतर प्रश्न पटलावर घेतले, परंतु काँग्रेस सदस्यांनी शेतकºयांच्या समस्यांचा मुद्दा उपस्थित करून शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची जोरदार मागणी करीत गोंधळ घातला. (वृत्तसंस्था)>जाचक तरतुदीसेवेतील व निवृत्त न्यायाधीश वसरकारी अधिकाºयांनी त्यांच्या कर्तव्य कृतीसंबंधीच्या तक्रारींचा तपास राज्य सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय करता येणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे.अशी संमती मिळेपर्यंत माध्यमांना अशा लोकसेवकांची नावेही प्रसिद्ध करता येणार नाहीत, असे निर्बंध दुरुस्तीद्वारे घालण्यात आले आहेत.खासगी फिर्याद दाखल झाली, तरी दंडाधिकाºयांना तिच्या तपासाचा आदेश लगेच देता येणार नाही. सरकारच्या संमतीसाठी त्यांना सहा महिने वाट पाहावी लागेल.