शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त विधेयक चिकित्सा समितीकडे, राजस्थान सरकारची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 04:21 IST

जयपूर : काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि विविध स्तरांतून होत असलेल्या प्रखर विरोधापुढे माघार घेत, राजस्थान सरकारने अखेर वादग्रस्त फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या चिकित्सा (प्रवर) समितीकडे वर्ग केले आहे.

जयपूर : काँग्रेससह अन्य राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे आणि विविध स्तरांतून होत असलेल्या प्रखर विरोधापुढे माघार घेत, राजस्थान सरकारने अखेर वादग्रस्त फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या चिकित्सा (प्रवर) समितीकडे वर्ग केले आहे. ७ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या वटहुकमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सोमवारी राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी विरोधाला न जुमानता हे विधेयक विधानसभेत मांडले होते. प्रश्नोत्तराच्या तासाच्या सुरुवातीलाच विधिमंडळ कामकाजमंत्री राजेंद्र राठौर यांनी सभागृहात सांगितले की, मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सोमवारी रात्री या विधेयकाबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांशी चर्चा केली. त्यावर गृहमंत्री निवेदन देतील.त्यानंतर, गृहमंत्री कटारिया यांनी सभागृहात सांगितले की, सप्टेंबरमध्ये हा वटहुकूम जारी करण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी घेण्यात आली होती. त्यावर अपक्ष आमदार माणिक चंद सुराणा म्हणाले की, या वटहुकमाची जागा घेणारे दुरुस्ती विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी घेणे जरूरी होते, हा खरा मुद्दा आहे. तेवढ्यात विरोधी आमदारांनी अध्यक्षांच्या आसनापुढे जमा होत विधेयक मागे घेण्याची मागणी करीत गोंधळ घातला. त्यावर कटारिया म्हणाले की, सदस्यांनी केलेल्या सूचनांवर सरकार विचार करेल. त्यानंतर, त्यांनी हे विधेयक चिकित्सा समितीकडे वर्ग करण्याचा ठराव मांडला. सभागृहाने हा ठराव संमत केला. या समितीला पुढच्या अधिवेशनात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.हे वादग्रस्त विधेयक चिकित्सा समितीकडे वर्ग करण्याचा ठराव संमत झाल्यानंतर, अध्यक्षांनी इतर प्रश्न पटलावर घेतले, परंतु काँग्रेस सदस्यांनी शेतकºयांच्या समस्यांचा मुद्दा उपस्थित करून शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची जोरदार मागणी करीत गोंधळ घातला. (वृत्तसंस्था)>जाचक तरतुदीसेवेतील व निवृत्त न्यायाधीश वसरकारी अधिकाºयांनी त्यांच्या कर्तव्य कृतीसंबंधीच्या तक्रारींचा तपास राज्य सरकारच्या पूर्वसंमतीशिवाय करता येणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे.अशी संमती मिळेपर्यंत माध्यमांना अशा लोकसेवकांची नावेही प्रसिद्ध करता येणार नाहीत, असे निर्बंध दुरुस्तीद्वारे घालण्यात आले आहेत.खासगी फिर्याद दाखल झाली, तरी दंडाधिकाºयांना तिच्या तपासाचा आदेश लगेच देता येणार नाही. सरकारच्या संमतीसाठी त्यांना सहा महिने वाट पाहावी लागेल.