शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

न्यायाधीश निवडीच्या नव्या पद्धतीस आव्हान देणा-या याचिका खारीज

By admin | Updated: August 25, 2014 23:58 IST

न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नवी पद्धत प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात येण्याआधीच त्याविरुद्ध केल्या गेलेल्या या याचिका अकाली असल्याचे कारण देत फेटाळल्या

नवी दिल्ली : न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची प्रचलित पद्धत मोडीत काढून त्याऐवजी सात सदस्यांच्या राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाकडून या नेमणुका करण्याची नवी पद्धत अवलंबिण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने प्रस्तावित केलेल्या नव्या पद्धतीस आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीसाठी दाखल करून न घेताच फेटाळल्या.न्या. अनिल आर. दवे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नवी पद्धत प्रत्यक्षात मूर्त स्वरूपात येण्याआधीच त्याविरुद्ध केल्या गेलेल्या या याचिका अकाली असल्याचे कारण देत फेटाळल्या. मात्र याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आलेले घटनात्मक मुद्दे न्यायालयाने खुले ठेवले असून योग्य वेळी याचिकाकर्ते त्याआधारे नव्याने याचिका करू शकतील, अशी मुभा खंडपीठने दिली. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने वरील निर्णय दिला. अ‍ॅटर्नी जनरलचे असे म्हणणे होते की, या याचिका ज्याबद्दल करण्यात आल्या आहेत ते घटनादुरुस्ती विधेयक व राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग विधेयक अद्यापही संसदेच्या कार्यकक्षेतच आहेत. या विधेयकांचे प्रत्यक्ष कायद्यात रूपांतर होण्यासाठी राज्यघटनेनुसार अजूनही काही टप्पे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या टप्प्याला न्यायालयाने या याचिकांवर विचार करणे म्हणजे सुरु असलेल्या वैधानिक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. मात्र एका याचिकाकर्त्याच्या वतीने ज्येष्ठ वकील फली नरिमन यांनी असा आग्रह धरला की, या टप्प्याला अशा याचिका केल्या जाऊ शकतात की नाही हाच विषय निर्णयासाठी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावा.(लोकमत न्यूज नेटवर्क)