शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

समाजात फूट पाडणाऱ्यांना धुडकावून लावा - सोनिया गांधी

By admin | Updated: October 4, 2015 00:24 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करीत समाजात फूट पाडणाऱ्या आणि खोटी आश्वासने देणाऱ्या लोकांना धुडकावून

भागलपूर (बिहार) : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करीत समाजात फूट पाडणाऱ्या आणि खोटी आश्वासने देणाऱ्या लोकांना धुडकावून लावण्याचे आवाहन शनिवारी येथे केले. तसेच आरक्षणाच्या मुद्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपात मॅचफिक्सिंग असल्याचा आरोपही त्यांनी केला.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कहलगाव येथून काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाच्या प्रचारास प्रारंभ केला. यावेळी आरक्षणावरून भाजपावर थेट लक्ष्य साधताना आपला पक्ष अनुसूचित जाती, जनजाती आणि गरिबांसाठी आरक्षणाच्या संवैधानिक धोरणाप्रति वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. बिहार विधानसभा निवडणुका निर्णायक असून राज्यासोबतच देशाच्या भविष्यावरही याचा परिणाम होणार आहे. मोदी बिहारवासीयांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करताना सोनिया म्हणाल्या की, त्यांनी जाहीर केलेले पॅकेज वास्तवापासून फार दूर आहे. पॅकेजचे सत्य काय आहे? कारण पंतप्रधान पॅकेजिंग आणि रिपॅकेजिंगचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी जुन्या योजना नव्या रूपात सादर केल्या. (वृत्तसंस्था)टीका करताना काय म्हणाल्या काँग्रेस अध्यक्षा...मोदी यांना सतत परदेशात राहण्यास आवडते. परदेशात गेले की ते तेथील प्रसिद्ध लोकांना अलिंगन देतात. परंतु आपल्या देशातील गरीब जनतेसाठी मात्र त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांनी विदेश दौरे अवश्य करावेत. पण ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांच्यासोबत राजकारण करू नये. २०१४ साली भाजपा नेते शाहनवाज हुसेन यांचा भागलपूरमधून पराभव झाला होता. यावरून येथील जनतेचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते.मोदींचा १५ महिन्यांचा कार्यकाळ अत्यंत धोकादायक राहिला. काही कॉर्पोरेटशिवाय कुणाचाही फायदा त्यांनी बघितला नाही.