शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार

By admin | Updated: August 21, 2014 02:19 IST

काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले. भारताने मात्र पाकिस्तानच्या या भूमिकेवर सडकून टीका केली. पाकची ही भूमिका सिमला करारातील तरतुदींपेक्षा भिन्न असल्याचे भारताने निक्षून सांगितले. भारताने कठोर भूमिका घेतल्यानंतरही पाकिस्तान मोदी सरकारला जुमानत नसल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे. 
सर्व पक्षांना या चर्चेत सामील करून घेणो गरजेचे आहे, असे वक्तव्य करून पाकिस्तानचे उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी झालेल्या आपल्या भेटीचे समर्थन केल्याच्या काही तासांनंतर भारताने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन म्हणाले, की सिमला करारानुसार काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि अन्य कोणत्याही मार्गाने हा प्रश्न सुटणार नाही.
भारताने केलेल्या विरोधाला डावलून काश्मिरी फुटीरवाद्यांसोबत आपण चर्चा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अब्दुल बासित यांनी आज व्यक्त केला. या चर्चेमुळे पाक भारतावर कोणते उपकार करीत नाही व भारतही पाकवर कोणते उपकार करीत नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
 
च्श्रीनगर-काश्मीर मुद्दय़ाबाबत फुटीरवाद्यांसोबत चर्चा करण्यात काही गैर नाही, असे मत फुटीरवादी नेते शाबीर अहमद शाह यांनी येथे व्यक्त केल़े  
च्काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय नसून त्रिपक्षीय असल्याचे सांगून, शाह यांनी अशाप्रकारच्या बैठका यापूर्वीही झाल्या असल्याचे म्हटल़े परराष्ट्र सचिवांची बैठक रद्द झाल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे अन्याय्य व लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे.