शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरवाद्यांसोबत चर्चा सुरूच राहणार

By admin | Updated: August 21, 2014 02:19 IST

काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : काश्मिरी फुटीरवाद्यांसोबतची चर्चा यापुढेही सुरूच राहील आणि सर्व संबंधित पक्षांना समाविष्ट करणो ही काश्मीरवरील भारत-पाक चर्चेतील ‘आधाररेषा’ आहे, असे पाकिस्तानने बुधवारी स्पष्ट केले. भारताने मात्र पाकिस्तानच्या या भूमिकेवर सडकून टीका केली. पाकची ही भूमिका सिमला करारातील तरतुदींपेक्षा भिन्न असल्याचे भारताने निक्षून सांगितले. भारताने कठोर भूमिका घेतल्यानंतरही पाकिस्तान मोदी सरकारला जुमानत नसल्याचे चित्र यातून निर्माण झाले आहे. 
सर्व पक्षांना या चर्चेत सामील करून घेणो गरजेचे आहे, असे वक्तव्य करून पाकिस्तानचे उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी काश्मिरी फुटीरवाद्यांशी झालेल्या आपल्या भेटीचे समर्थन केल्याच्या काही तासांनंतर भारताने त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन म्हणाले, की सिमला करारानुसार काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यानचा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि अन्य कोणत्याही मार्गाने हा प्रश्न सुटणार नाही.
भारताने केलेल्या विरोधाला डावलून काश्मिरी फुटीरवाद्यांसोबत आपण चर्चा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अब्दुल बासित यांनी आज व्यक्त केला. या चर्चेमुळे पाक भारतावर कोणते उपकार करीत नाही व भारतही पाकवर कोणते उपकार करीत नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.
 
च्श्रीनगर-काश्मीर मुद्दय़ाबाबत फुटीरवाद्यांसोबत चर्चा करण्यात काही गैर नाही, असे मत फुटीरवादी नेते शाबीर अहमद शाह यांनी येथे व्यक्त केल़े  
च्काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय नसून त्रिपक्षीय असल्याचे सांगून, शाह यांनी अशाप्रकारच्या बैठका यापूर्वीही झाल्या असल्याचे म्हटल़े परराष्ट्र सचिवांची बैठक रद्द झाल्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे अन्याय्य व लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले आहे.