शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींची घटनातज्ज्ञांशी चर्चा सुरू

By admin | Updated: May 14, 2014 04:15 IST

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर याबाबत राष्ट्रपतींनी घटनातज्ञांशी केली चर्चा.

नवी दिल्ली: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणती पावले उचलणे शक्य आहे यादृष्टीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कायदा व घटनातज्ज्ञांशी सल्लामसलत सुरु केली आहे. निवडणुकीचे मतदान संपण्यापूर्वीच यास सुरुवात झाली असून गेल्या आठवडाभरात राष्ट्रपतींनी फली नरीमन व सॉली सोराबजी हे घटनातज्ज्ञ व सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांच्यासह इतरही काही तज्ज्ञांची मते जाणून घेतली, असे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीत एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपतींची भूमिका त्या पक्षाला किंवा ाघाडीला सरकार स्थापण्यासाठी औपचारिकपणे पाचारण करणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते. मात्र निकाल त्रिशंकु अवस्थेत असेल तर राष्ट्रपतींना सरकार स्थापनेसाठी स्वत:च्या विवेकाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांनी नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा केली ते स्पष्ट झाले नाही. मतदान संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी घेतलेली ही भेट औपचारिक मानली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)