शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

फिल्म इन्स्टिट्यूटला पर्यायी संस्था उभारण्याची चर्चा तथ्यहीन

By admin | Updated: October 9, 2015 00:54 IST

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नकारात्मक विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींचे वर्चस्व आहे. बॉलिवूडमधील मान्यवरांच्या मदतीने नवी संस्था स्थापन करून

- सुरेश भटेवारा,  नवी दिल्लीपुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये नकारात्मक विचारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींचे वर्चस्व आहे. बॉलिवूडमधील मान्यवरांच्या मदतीने नवी संस्था स्थापन करून तिला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवा, कोट्यवधींचे अनुदान या नव्या संस्थेकडे वळवा, असा सल्ला रा. स्व. संघाने केंद्र सरकारला दिला, मात्र यात तथ्य नाही. हताश मनोवृत्तीतून जन्मलेला हा विचार आहे. केंद्र सरकार तो गांभीर्याने घेईल, असे वाटत नाही. कारण त्यासाठी सरकारला पुण्याची संस्था बंद करावी लागेल. अध्यक्षाच्या ज्या नेमणुकीवरून खरा वाद उद्भवला, त्यांनाही वाऱ्यावर सोडल्यासारखे होईल, असे संकेत केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाशी संबंधित विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत. समस्येचे मूळ केंद्र सरकार समजावून घेत नाही, तोपर्यंत हा विषय अनिर्णीत राहील, असा धोका जाणवत असल्याचा सूर मात्र संपकरी विद्यार्थ्यांनी आळवला. गजेंद्र चौहान कोणत्याही निकषांवर योग्य नाहीत, असे विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळेच तोडगा आजवर निघालेला नाही. २0११च्या बॅचचे विद्यार्थी नेते विकास अर्स म्हणाले, ‘माहिती व नभोवाणी मंत्रालयाच्या ज्या अधिकाऱ्यांकडे संपकऱ्यांशी चर्चा करण्याची सूत्रे आहेत, त्यांना सहानुभूती आहे, तथापि अध्यक्षाच्या नेमणुकीवरील आक्षेपाबाबत बोलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. पाच बैठका सकारात्मक वातावरणात झाल्या. दुरुस्त्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याची तयारीही या अधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. तथापि मूळ विषयाला अद्याप स्पर्श झालेला नसल्यामुळे चर्चा खोळंबली आहे. आम्ही आशा सोडलेली नाही. १0 आॅक्टोबरला सहावी बैठक आहे.’ जुन्या विद्यार्थ्यांना संस्थेतून घालवण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू झाल्याबरोबर हे विद्यार्थी हादरले. व संपाचे हत्यार उपसले, याबाबत विचारता विद्यार्थ्यांच्या नेत्या व अखेरच्या वर्षाच्या विद्यार्थिनी साक्षी गुलाटी म्हणाल्या, ‘२00७चा एकही विद्यार्थी संस्थेत नाही. इन्स्टिट्यूटमध्ये साधनांची कमतरता आहे, नवे तंत्रज्ञान शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी वेळ लागतो, २0१४पर्यंत हे तंत्रज्ञान संस्थेत जेमतेम विकसित झाले. अशा विविध कारणांमुळे २00८चे काही विद्यार्थी अद्याप संस्थेत आहेत. विकास अर्स म्हणाले, अभ्यासक्रम व्यापक आहे. ३ वर्षांत संपत नाही. याचा विचार व्यवस्थापनाने केला पाहिजे. मुंबईच्या स्टुडिओत जाऊन विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल्स कसे पूर्ण केले, त्याचे तपशील सरकारने समजावून घ्यावेत.राजकारणाशी संबंध नाहीविद्यार्थिनी साक्षी गुलाटी म्हणाल्या, कोणत्या विचारसरणीचा राजकारणावर अधिक प्रभाव आहे, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आग्रह इतकाच की जी कला शिकण्यासाठी आम्ही इथे आलो, त्याचे नेतृत्व या क्षेत्रात गुणवत्ता सिद्ध केलेल्या व्यक्तीकडेच असावे.