शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

अशांत काश्मीर खो-यात मोहन भागवतांची बैठक, सरकारसमोर सुरक्षेचं आव्हान

By admin | Updated: May 16, 2017 15:12 IST

गेल्या एक वर्षापासून काश्मीर खोरं धुमसत असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अखिल भारतीय प्रचारक संमेलनाचे आयोजन तेथे करणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. 16 - हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानीच्या खात्मा करण्यात आल्यापासून काश्मीर खो-यात हिंसाचार वाढला आहे. जवळपास गेल्या एक वर्षापासून काश्मीर खोरं धुमसत असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्या अखिल भारतीय प्रचारक संमेलनाचे आयोजन तेथे करणार आहे. 
 
या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे काश्मीरमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली पाहिजे, असा संदेश केंद्रातील मोदी सरकारला देण्यासाठी आरएसएसनं येथे बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 18 जुलै ते 20 जुलैपर्यंत चालणा-या या संमेलनात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासहीत आरएसएसमधील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 
 
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून स्थानिकांची आंदोलनं, भारतीय जवान-पोलिसांवर होणारी दगडफेक, सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि दहशतवाद्यांची घुसखोरीशिवाय होणा-या हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत काश्मीरमध्ये सरसंघचालक आरएसएसमधील नेते आणि कार्यकर्ते तेथे संमेलनासाठी दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतरही आरएसएसनं बैठकीचा निर्णय घेतला. "द एशियन एज"ने दिलेल्या वृत्तानुसार, आरएसएसनं जम्मू काश्मीरमधील संमलेनाचा निर्णय या वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला होता, अशी माहिती एका ज्येष्ठ आरएसएस नेत्यानं दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे युतीचं सरकार आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती राज्याच्या मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचे निर्मल सिंह येथील उप-मुख्यमंत्री आहेत. 
 
दरम्यान, हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी एका चकमकीत ठार झाल्यापासून काश्मीर खोरे अशांत झाले आहे. येथे प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून येत आहे. गेल्या महिन्यात काश्मीर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान सर्वाधिक कमी मतदान झाले आणि विविध झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये 6 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच शाळकरी विद्यार्थ्यांकडून सुरक्षा दलातील जवान आणि पोलिसांना लक्ष्य करून त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे.