शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

अशांत काश्मीर खो-यात मोहन भागवतांची बैठक, सरकारसमोर सुरक्षेचं आव्हान

By admin | Updated: May 16, 2017 15:12 IST

गेल्या एक वर्षापासून काश्मीर खोरं धुमसत असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अखिल भारतीय प्रचारक संमेलनाचे आयोजन तेथे करणार आहे.

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. 16 - हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानीच्या खात्मा करण्यात आल्यापासून काश्मीर खो-यात हिंसाचार वाढला आहे. जवळपास गेल्या एक वर्षापासून काश्मीर खोरं धुमसत असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्या अखिल भारतीय प्रचारक संमेलनाचे आयोजन तेथे करणार आहे. 
 
या संमेलनाचा मुख्य उद्देश म्हणजे काश्मीरमधील परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली पाहिजे, असा संदेश केंद्रातील मोदी सरकारला देण्यासाठी आरएसएसनं येथे बैठक घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 18 जुलै ते 20 जुलैपर्यंत चालणा-या या संमेलनात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासहीत आरएसएसमधील अनेक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहादेखील या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 
 
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षभरापासून स्थानिकांची आंदोलनं, भारतीय जवान-पोलिसांवर होणारी दगडफेक, सीमेपलिकडून होणारा गोळीबार आणि दहशतवाद्यांची घुसखोरीशिवाय होणा-या हल्ल्यांचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत काश्मीरमध्ये सरसंघचालक आरएसएसमधील नेते आणि कार्यकर्ते तेथे संमेलनासाठी दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचं सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतरही आरएसएसनं बैठकीचा निर्णय घेतला. "द एशियन एज"ने दिलेल्या वृत्तानुसार, आरएसएसनं जम्मू काश्मीरमधील संमलेनाचा निर्णय या वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला होता, अशी माहिती एका ज्येष्ठ आरएसएस नेत्यानं दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा)चे युतीचं सरकार आहे. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती राज्याच्या मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचे निर्मल सिंह येथील उप-मुख्यमंत्री आहेत. 
 
दरम्यान, हिजबुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वानी एका चकमकीत ठार झाल्यापासून काश्मीर खोरे अशांत झाले आहे. येथे प्रत्येक दिवशी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून येत आहे. गेल्या महिन्यात काश्मीर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीदरम्यान सर्वाधिक कमी मतदान झाले आणि विविध झालेल्या हिंसाचारांच्या घटनांमध्ये 6 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच शाळकरी विद्यार्थ्यांकडून सुरक्षा दलातील जवान आणि पोलिसांना लक्ष्य करून त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे.