शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

प्रत्येक पाचव्या पदार्थात भेसळ

By admin | Updated: July 21, 2015 22:28 IST

पॅकेटबंद दूध, पाणी असो की मिठाई. प्रत्येक पाचव्या पदार्थात भेसळ आहे. डबाबंद खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांनी मापदंडांचे उल्लंघन चालवले आहे

नवी दिल्ली : पॅकेटबंद दूध, पाणी असो की मिठाई. प्रत्येक पाचव्या पदार्थात भेसळ आहे. डबाबंद खाद्यपदार्थ बनविणाऱ्या कंपन्यांनी मापदंडांचे उल्लंघन चालवले आहे. गेल्यावर्षी खाद्यपदार्थांच्या तपासणीत प्रत्येक पाचवा नमुना भेसळयुक्त आढळला, ही वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उघड केली.२०१४-१५ या वर्षात देशभरातील डबाबंद खाद्यपदार्थांचे ६८,१९७ नमुने घेण्यात आले. त्यातील ६०,५४८ नमुन्यांच्या तपासणीत एकूण १२,०७७ नमुने भेसळयुक्त असल्याचे किंवा डब्यांवर योग्यप्रकारे माहिती नमूद केली नसल्याचे आढळून आले. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने(एफएसएसएआय) सर्व राज्यांतील बाजारात विकले जात असलेले दूध, बाटलीबंद पाणी,मिठाई आणि खाद्य तेलांच्या भेसळीबाबत निगराणी ठेवण्याचा आदेश दिला काय, असा प्रश्न दर्डा यांनी विचारला होता. एफएसएसएआयकडून वेळोवेळी राज्यांच्या संबंधित प्राधिकरणांना अन्नपदार्थांच्या सुरक्षेसंबंधी बाबींची माहिती पुरविली जाते. या प्राधिकरणाच्या केंद्रीय सल्लागार समितीच्या (सीएसी) बैठकीत अशा मुद्यांवर चर्चा केली जाते. राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना या चर्चेत सहभागी करवून घेतले जाते, अशी माहिती नड्डा यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)