शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत

By admin | Updated: September 7, 2015 18:21 IST

कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. ७ - कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. युद्ध सुरु झाल्यावर वाजपेयींनी दिलीपकुमार व नवाझ शरीफ यांच्यात दुरध्वनीव्दारे चर्चा घडवली होती. यात दिलीपकुमार यांनी पाकिस्तानने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन शरीफ यांना केले होते. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांनी एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकात कारगिल युद्धातील एका प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. कारगिल युद्ध सुरु झाल्यावर अटलबिहारी वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला. लाहोर दौ-यावर असताना शरीफ यांनी योग्य सन्मान दिला नाही अशी तक्रार वाजपेयींनी केली होती. एकीकडे लाहोरमध्ये वाजपेयींचे जल्लोषात स्वागत होत असताना दुसरीकड़े पाक सैन्य भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते असे वाजपेयींनी शरीफ यांना सांगितले. यानंतर शरीफ यांनी या प्रकाराची आपल्याला काहीच माहिती नाही, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा करुन तुमच्याशी पुन्हा चर्चा करतो असे शरीफ यांनी वाजपेयींना सांगितले. यानंतर वाजपेंयींनी एका व्यक्तीला तुमच्याशी बोलायचे आहे असे शरीफ यांना सांगितले. ही व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार होती. दिलीप कुमार यांनी शरीफ यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. भारत - पाकमधील संबंधामुळे भारतातील मुसलमान भयग्रस्त झाले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायलाही भीती वाटते. त्यामुळे तुम्हीच आता पुढाकार घ्यावा असे आवाहन दिलीप कुमार यांनी केले. 'तुम्ही भारत - पाकमधील शांतीपूर्ण संबंधांचे समर्थक आहात पण तुमच्याकडून आम्हाला अशी आशा नाही' असेही दिलीपकुमार यांनी शरीफ यांना सुनावले होते.  पाकिस्तानने यापूर्वी दिलीप कुमार यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानितही केले होते.