शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कारगिल युद्धात वाजपेयींनी घेतली होती दिलीप कुमारांची मदत

By admin | Updated: September 7, 2015 18:21 IST

कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. ७ - कारगिल युद्ध सुरु झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची मदत घेतल्याचे समोर आले आहे. युद्ध सुरु झाल्यावर वाजपेयींनी दिलीपकुमार व नवाझ शरीफ यांच्यात दुरध्वनीव्दारे चर्चा घडवली होती. यात दिलीपकुमार यांनी पाकिस्तानने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन शरीफ यांना केले होते. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसूरी यांनी एक पुस्तक लिहीले असून या पुस्तकात कारगिल युद्धातील एका प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला आहे. कारगिल युद्ध सुरु झाल्यावर अटलबिहारी वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला. लाहोर दौ-यावर असताना शरीफ यांनी योग्य सन्मान दिला नाही अशी तक्रार वाजपेयींनी केली होती. एकीकडे लाहोरमध्ये वाजपेयींचे जल्लोषात स्वागत होत असताना दुसरीकड़े पाक सैन्य भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते असे वाजपेयींनी शरीफ यांना सांगितले. यानंतर शरीफ यांनी या प्रकाराची आपल्याला काहीच माहिती नाही, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा करुन तुमच्याशी पुन्हा चर्चा करतो असे शरीफ यांनी वाजपेयींना सांगितले. यानंतर वाजपेंयींनी एका व्यक्तीला तुमच्याशी बोलायचे आहे असे शरीफ यांना सांगितले. ही व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार होती. दिलीप कुमार यांनी शरीफ यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. भारत - पाकमधील संबंधामुळे भारतातील मुसलमान भयग्रस्त झाले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायलाही भीती वाटते. त्यामुळे तुम्हीच आता पुढाकार घ्यावा असे आवाहन दिलीप कुमार यांनी केले. 'तुम्ही भारत - पाकमधील शांतीपूर्ण संबंधांचे समर्थक आहात पण तुमच्याकडून आम्हाला अशी आशा नाही' असेही दिलीपकुमार यांनी शरीफ यांना सुनावले होते.  पाकिस्तानने यापूर्वी दिलीप कुमार यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानितही केले होते.