शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

दिग्विजय सिंहांची गोवा, कर्नाटकच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी

By admin | Updated: April 29, 2017 22:10 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्त करण्यात आली आहे. 
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही तेथे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले नाही. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे.
 
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही सत्ता स्थापन करू न शकल्याने काँग्रेसवर अनेकांनी उपहासात्मक टीका केली. यावर भाजपानं काँग्रेसच्या जखमेवर मिठ चोळत म्हटले होते की, "दिग्विजय सिंह गोव्यात सुट्टी साजरी करत  होते". शिवाय, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाषणादरम्यान दिग्विजय सिंहांचे आभार मानले होते. दिग्विजय सिंग यांनी काहीही न केल्याने गोव्यात भाजपलास सत्ता स्थापन करण्यात यश आलं, अशी उपहासात्मक टीका त्यांनी दिग्विजय सिंहांवर केली होती.  
 
दरम्यान, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन येथे नवीन राजकीय रणनीती आखून पक्षाचा प्रभारी बदलण्यात आल्याची चर्चा आहे.  
 
काही दिवसांपूर्वी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी पार्टीनं गोव्यामध्ये सत्तास्थापन न केल्याने दिग्विजय सिंह आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. 21 आमदार निवडून आलेले असतानाही दिग्विजय यांनी राज्यपालांकडे जाण्यापासून रोखले, असेही ते म्हणालेत. 
 
दरम्यान, सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपाल प्रस्ताव येण्याची प्रतीक्षा करायला हवी, असा सल्ला दिग्विजय यांनी त्यावेळी दिला. दिग्विजय यांच्या सांगण्यावरुन पार्टीनं थांबवण्याचा निर्णय घेतला. 
 
कारण नियमाप्रमाणे राज्यपाल निवडणुकीतील निकालानुसार सर्वात मोठ्या पक्षाला सरकारस्थापनेचं निमंत्रण देतात. पण या सगळ्या कालावधीत भाजपाने लहान लहान पक्षांची मोट बांधत बहुमताचा आकडा गाठला व सरकार स्थापन केले. दरम्यान घडल्या प्रकाराबाबत दिग्विजय सिंह यांनी गोव्याच्या जनतेची माफीही मागितली.