शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांना डिजिटल पंख!

By admin | Updated: July 2, 2015 04:19 IST

बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भव्य समारंभात उद््घाटन केले.

नवी दिल्ली : बदलत्या काळात कोट्यवधी भारतीयांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आखलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील भव्य समारंभात उद््घाटन केले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून साकारलेली डिजिटल शक्ती अवघे विश्व कवेत घेऊ पाहात असल्याच्या स्थितीचे भान दाखवत १८ लाखांना रोजगार देत तरुणाईच्या शक्तीला तंत्रज्ञानाच्या शक्तीशी जोडण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्याला हातभार लावण्यासाठी देशातील उद्योग जगताने तब्बल साडेचार लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे. अनेक उद्योगपतींनी या चळवळीत आपणही पंतप्रधानांबरोबर असल्याचे आश्वासन दिले आहे. भरगच्च गर्दीच्या साक्षीने इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये डिजिटल इंडियाच्या बोधचिन्हाचे दिमाखदार प्रकाशनही झाले. डिजिटल शक्तीला समजून घेणे आवश्यक असून, त्यातून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने पूर्ण होतील याची मला खात्री आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाविषयी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की ही काळाची गरज आहे. जर आपण या बदलाला समजून घेतले नाही तर जग दूर जाईल, आपण पाहात राहू. या प्रकल्पाचा भाग म्हणून १ ते ७ जुलै हा डिजिटल सप्ताह म्हणून देशभरात साजरा होणार आहे. डिजिटल वीकची घोषणा लोकांमध्ये जागरूकता व सहभाग वाढविण्यासाठी आहे. डिजिटल इंडियाची मुख्य उद्दिष्टे-डिजिटल इंडियाचे मुख्य उद्दिष्ट भारतात क्रांती घडविण्याचे असून, भारताचा कायापालट डिजिटल क्षमता असणाऱ्या व अर्थकारणाची माहिती असणाऱ्या समाजात केला जाणार आहे. या एका योजनेअंतर्गत अनेक नव्या संकल्पना आहेत.-भारतीय समाज अर्थकारणाची माहिती असणारा असावा, तसेच सरकारचे सुशासन प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.-इलेक्ट्रॉनिक्स खाते व माहिती तंत्रज्ञान खाते यांनी एकत्रितपणे ही योजना तयार केली असून, केंद्र सरकारची अनेक खाती व राज्य सरकारांची मदत ही योजना तयार करण्यासाठी झालेली आहे. या योजनेवर नियंत्रण ठेवणाऱ्या समितीचे पंतप्रधान अध्यक्ष आहेत.डिजिटल इंडिया म्हणजे जनतेला सेवा देण्यासाठी एक मोहीम आहे.- अरु ण जेटली, केंद्रीय अर्थमंत्रीपंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वोत्कृष्ट आणि डिजिटल विश्वातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत.- अनिल अंबानी, उद्योगपतीडिजिटल इंडियातील पुढाकार देशाला अत्यल्प काळात बदलू शकतो. -सुनील मित्तल, उद्योगपतीडिजिटल इंडियासाठी मोदी यांनी वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी ठेवली आहे. आम्हाला या संस्मरणीय क्षणाचा अभिमान आहे.-कुमार मंगलम बिर्ला, उद्योगपतीनागरिकांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी हे एक पहिले सक्षम पाऊल आहे.- अझीम प्रेमजी, उद्योगपतीआम्ही ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती करीत आहोत.- सायरस मिस्त्री, टाटा समूहाचे अध्यक्ष