शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

डिजिटल इंडियाने बदलेल भविष्य!

By admin | Updated: November 14, 2016 01:33 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीआधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे. नऊ स्तंभावर उभ्या असलेल्या या उपक्रमात विविध सेवांचा अंतर्भाव आहे. त्याचे सारथ्य भारताची गुणवत्ता (इंडियन टॅलंट= आयटी)+ माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी = आयटी)+भविष्यातला भारत (इंडिया टुमारो = आयटी) हे तीन आयटी करीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत तेबोलत होते.डिजिटल इंडिया ज्या ९ स्तंभावर उभा आहे, त्यात ब्रॉडबँड हायवे, युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट सेवा, ई-शासन, तंत्रज्ञान आधातित सरकारी सुधारणा, ई क्रांतीद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेवा, सर्वांसाठी माहिती, शून्य आयातीच्या लक्ष्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनात वृद्धी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारवाढ व आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीला पूरक अद्ययावत माहिती पुरवणे या कार्यक्रमांचा समावेश आहे.मायगव्ह हे भारत सरकारचे ई-शासनासाठी नागरिक भागीदारीचे व्यासपीठ आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सर्वसामान्य लोक या प्लॅटफॉर्मवर सूचना कळवू शकतात. त्यावर ३७ लाखांहून अधिक लोकांनी आपली नोंदणी केली आहे. शोध व संशोधनासाठी ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्म (ओजीडी)आहे. त्यात विविध प्रकारचे डेटाबेस अ‍ॅक्सेस करता येतात. जीवन प्रमाण ही देशातल्या पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिफिकेट देणारी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक डिजिटल व्यवस्था आहे. मौल्यवान दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर्स सुविधा आहे. त्याचा लाभ २७ लाख लोकांनी घेतला असून ३२.२४ लाख दस्तऐवज सुरक्षितपणे त्यावर अपलोड झाले आहेत, असे ते म्हणाले.