शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

डिजिटल इंडियाने बदलेल भविष्य!

By admin | Updated: November 14, 2016 01:33 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे.

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीआधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचे भाग्य बदलण्याची क्षमता डिजिटल इंडिया उपक्रमात आहे. हा सर्वसमावेशक उपक्रम श्रीमंतांपुरता मर्यादित नसून, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून आखला आहे. नऊ स्तंभावर उभ्या असलेल्या या उपक्रमात विविध सेवांचा अंतर्भाव आहे. त्याचे सारथ्य भारताची गुणवत्ता (इंडियन टॅलंट= आयटी)+ माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी = आयटी)+भविष्यातला भारत (इंडिया टुमारो = आयटी) हे तीन आयटी करीत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले. अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत तेबोलत होते.डिजिटल इंडिया ज्या ९ स्तंभावर उभा आहे, त्यात ब्रॉडबँड हायवे, युनिव्हर्सल अ‍ॅक्सेस मोबाईल कनेक्टिव्हिटी, सार्वजनिक इंटरनेट सेवा, ई-शासन, तंत्रज्ञान आधातित सरकारी सुधारणा, ई क्रांतीद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेवा, सर्वांसाठी माहिती, शून्य आयातीच्या लक्ष्यासह इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनात वृद्धी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगारवाढ व आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीला पूरक अद्ययावत माहिती पुरवणे या कार्यक्रमांचा समावेश आहे.मायगव्ह हे भारत सरकारचे ई-शासनासाठी नागरिक भागीदारीचे व्यासपीठ आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सर्वसामान्य लोक या प्लॅटफॉर्मवर सूचना कळवू शकतात. त्यावर ३७ लाखांहून अधिक लोकांनी आपली नोंदणी केली आहे. शोध व संशोधनासाठी ओपन गव्हर्नमेंट डेटा प्लॅटफॉर्म (ओजीडी)आहे. त्यात विविध प्रकारचे डेटाबेस अ‍ॅक्सेस करता येतात. जीवन प्रमाण ही देशातल्या पेन्शनर्ससाठी लाईफ सर्टिफिकेट देणारी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक डिजिटल व्यवस्था आहे. मौल्यवान दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर्स सुविधा आहे. त्याचा लाभ २७ लाख लोकांनी घेतला असून ३२.२४ लाख दस्तऐवज सुरक्षितपणे त्यावर अपलोड झाले आहेत, असे ते म्हणाले.