शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

उमेदवारीवरून सपातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

By admin | Updated: December 27, 2016 00:46 IST

उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षातील सत्तासंघर्ष व मतभेद सोमवारी नव्याने समोर आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमेदवारांची समांतर यादी तयार केल्याबद्दल

लखनौ : उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षातील सत्तासंघर्ष व मतभेद सोमवारी नव्याने समोर आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमेदवारांची समांतर यादी तयार केल्याबद्दल पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यादव यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवपाल यादव यांनी निवडलेली १७५ नावे आपल्या चुलत्याशी दोन हात करीत असलेल्या अखिलेश यादव यांच्या पचनी पडलेली नाहीत, असे पक्षातील अंतर्गत सूत्रांकडून समजते. अखिलेश यादव यांनी राज्य विधानसभेतील सर्वच्या सर्व ४०३ जागांवर आपल्या पसंतीच्या उमेदवारांची निवड करून ती यादी पक्षाचे सर्वोच्च नेते व आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्याकडे पाठवली आहे. २४ डिसेंबर रोजी अखिलेश यादव यांनी आपल्या निवासस्थानी प्रथमच आमदारांची भेट घेऊन त्यांना पक्षातर्फे तिकीट देण्याचे आश्वासन दिले. शिवपाल यादव यांनी तिकीट वाटपाचे अधिकार प्रत्यक्षात मलाच आहेत, असे सूचित करणारे टिष्ट्वटवर टिष्ट्वट केल्यानंतर पक्षातील तीव्र मतभेद समोर आले. शिवपाल यादव यांनी १७५ उमेदवारांची नावे आधीच निश्चत झालेली असून पक्षाची प्रतिमा डागाळणारी कोणतीही बेशिस्त खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवरच पक्षातर्फे तिकीट दिले गेले आहे व आताही तोच निकष आहे. १७५ जणांना तिकिटे दिलीही गेली आहेत. मुख्यमंत्र्याची निवड पक्षाच्या घटनेनुसार विधिमंडळ पक्ष करील, असे शिवपाल यादव यांनी हिंदी भाषेतून केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. (वृत्तसंस्था)भाजपचे तेज मावळले : मायावतीनोटाबंदीमुळे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना मोठा फटका बसल्याचा भाजपने केलेला दावा पक्षाच्या नेत्या मायावती यांनी फेटाळला. नोटाबंदीमुळे सामान्य लोकांना जो त्रास झाला त्याची किमत उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोजावी लागेल व त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील चमक उतरली आहे, असे मायावती यांनी सोमवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.भाजपचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह व केंद्रीय नेत्यांच्या चेहऱ्यावरील चमक निघून गेली आहे कारण बसपचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे, असे त्या म्हणाल्या. येत्या निवडणुकीत बसपच सत्तेवर येणार असल्यामुळे माझ्या किंवा बसपच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरील चमक गेलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.नोटाबंदी मोदींच्या मित्रांसाठी : बब्बरमुजफ्फरनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काही मित्रांच्या फायद्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असल्याचा आरोप उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी रविवारी केला.पुरकाझी (जि. मुजफ्फरनगर) गावात ते जाहीर सभेत बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना खूप त्रास होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपला धडा शिकवतील, असे बब्बर म्हणाले.