शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

त्वचेच्या आजारामुळे हातांच्या ठशांत फरक; आरबीआयचा नोकरीवर ठेवण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 07:04 IST

तरुणाची उच्च न्यायालयात धाव; परीक्षा उत्तीर्ण होऊनही अन्याय केल्याचा आरोप करत याचिका दाखल

मुंबई : प्रत्येकवेळी बायोमॅट्रिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या हातांच्या ठशांत साम्य नसल्याने रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (आरबीआय)ने नोकरीवर ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे त्वचेच्या आजाराने गांजलेल्या २७ वर्षीय तरुणाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

हायपरहायड्रोसिस (त्वचेचा आजार) असलेल्या अक्षय सपकाळ याने साहाय्यक पदासाठी आरबीआयमध्ये अर्ज केला. सर्व परीक्षा उत्तीर्ण करूनही बायोमॅट्रिक पद्धतीने दरवेळी घेण्यात येणाºया हाताच्या ठशांमध्ये साम्य नसल्याने आरबीआयने सपकाळ याला नोकरी देण्यास नकार दिला. त्यामुळे सपकाळ याने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अकिल कुरेशी व न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे होती.

अक्षयला असलेल्या त्वचेच्या आजारामुळे त्याच्या तळहातावरची व बोटांवरची त्वचा सारखी निघत असते. त्यामुळे त्याच्या हाताच्या ठशांमध्ये साम्य नसते, असा दावा अक्षयने न्यायालयात केला आहे.याचिकेनुसार, डिसेंबर २०१६ मध्ये तो प्राथमिक आॅनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याला आरबीआयने मुख्य लेखी परीक्षेला बसण्यास सांगितले. आरबीआयने निवडलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचताच सर्व उमेदवारांना बायोमॅट्रिक पद्धतीने हाताचे ठसे देण्यास सांगण्यात आले. परीक्षा केंद्रात सर्व उमेदवारांचे फोटोही काढण्यात आले.

त्यानंतर परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा सर्व उमेदवारांना हाताचे ठसे देण्यास सांगण्यात आले. मात्र, सकाळी घेण्यात आलेल्या हाताचे ठसे आणि परीक्षा संपताना घेतलेले हाताचे ठसे यात साम्य नव्हते. त्या वेळी अक्षयने आपली समस्या तेथील अधिकाऱ्यांना सांगितली आणि कागदावर त्याचे हाताचे ठसे व हमीपत्र दिले.मे २०१७ मध्ये त्याला दुसºया टप्प्यातील परीक्षेसाठी आरबीआयने बोलाविले आणि तीही परीक्षा तो उत्तीर्ण झाला. त्या वेळेसही परीक्षा केंद्रात जाताना आणि बाहेर येताना बायोमॅट्रिक पद्धतीने हाताचे ठसे घेण्यात आले. त्या वेळीही त्यामध्ये साम्य नव्हते. आरबीआयने तेव्हाही सर्व उमेदवारांचे फोटो काढले होते,असे सपकाळ याने याचिकेत म्हटले आहे.

त्यानंतर सपकाळने अनेक वेळा आपल्या आजारासंबंधी आरबीआयला पत्राने कळविले. मात्र, जुलै २०१७ मध्ये आरबीआयने त्याला नोकरी देण्यास नकार दिला. बायोमॅट्रिक पद्धतीने घेण्यात आलेल्या हातांच्या ठशांमध्ये साम्य नसल्याने नोकरी देऊ शकत नाही, असे आरबीआयने सपकाळला कळविले.या याचिकेवर सोमवारी सुनावणी होती. आरबीआयने त्याच्या याचिकेवर आक्षेप घेतला. सपकाळच परीक्षेला उपस्थित होता, हे आरबीआय निश्चितपणे सांगू शकत नाही. मात्र, परीक्षा दिल्यानंतर सपकाळऐवजी अन्य उमेदवार परीक्षा रूममधून बाहेर यायचा, असे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी न्यायालयाला सांगितले.‘दोन आठवड्यांत माहिती सादर करा’‘एक्स’ परीक्षा केंद्रात गेला आणि ‘वाय’ बाहेर आला, याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरबीआयने परीक्षा केंद्रावर काढलेले सर्व फोटो जमा करावेत आणि त्या वेळी सपकाळ परीक्षेला बसलेला की नाही, याची खात्री करावी, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने आरबीआयला दोन आठवड्यांत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक