शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

मल्ल्या यांनी संपत्ती खरोखर प्रामाणिकपणे जाहीर केली का?

By admin | Updated: March 10, 2017 05:17 IST

आपण आपली संपत्ती खरोखरच प्रामाणिकपणे जाहीर केली आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने भारतातून परागंदा झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना विचारला आहे.

नवी दिल्ली : आपण आपली संपत्ती खरोखरच प्रामाणिकपणे जाहीर केली आहे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने भारतातून परागंदा झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना विचारला आहे. मल्ल्या यांच्या वकिलास न्यायालयाने हा सवाल सुनावणी दरम्यान केला.एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांनी मल्ल्या यांच्याकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी न्यायालयात खटला दाखल केला. मल्ल्या यांनी तीन मुलांच्या खात्यावर ४0 दशलक्ष डॉलर हस्तांतरित करून कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे, असा आरोप एसबीआयने केला. त्यावर न्या. ए.के. गोयल आणि यू.यू. ललित यांनी वकिलाकडे मल्ल्यांंच्या प्रामाणिकपणाबाबत विचारणा केली.बँकांचे अटर्नी जनरल वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, ब्रिटनमधील कंपनी डियागिओ पीएलसीकडून ४0 दशलक्ष डॉलर मिळाल्याचे मल्ल्या यांनी न्यायालयात सांगितलेच नाही. त्यावर न्यायालयाने मल्ल्या यांच्या वकिलास सांगितले की, अटर्नी जनरल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या. मल्ल्या यांनी त्यांची संपत्ती खरोखरच प्रामाणिकपणे जाहीर केली आहे का? आपल्या मुलांच्या नावे ४0 दशलक्ष डॉलर हस्तांतरित करून मल्ल्या यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला आहे का, याचे उत्तरही सुप्रीम कोर्टास हवे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)वसुली करण्याचे आदेश देण्याची बँकांची विनंतीकर्जवसुलीसाठी बँकांनी मल्ल्या यांच्या विरोधात खटला गुदरल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना आपली सर्व प्रकारची चल-अचल संपत्ती तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्यास मनाई करणारा आदेश दिला होता.३ मार्च रोजी बँकांनी न्यायालयात सांगितले होते की, मल्ल्या यांना ब्रिटिश कंपनीकडून मिळालेले पैसे त्यांनी परस्पर आपल्या मुलांच्या खात्यावर हस्तांतरित केले. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालय आणि ऋण वसुली प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग झाला आहे. ही रक्कम वसूल करण्याचे आदेश बँकांनी न्यायालयाकडून मागितले आहेत. या आधी ११ जानेवारीला झालेल्या सुनावणीत मल्ल्या यांना ३ आठवड्यांची मुदत देण्यात आली होती.