शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
6
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
7
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
8
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
9
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
10
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
11
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
12
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
13
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
14
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
15
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
16
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
17
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
18
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
19
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
20
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...

धर्मद्वेषाला थारा नाहीच- मोदींचा इशारा धार्मिक स्वातंत्र्य जपणार : चर्चवरील हल्ल्यानंतर प्रथमच तोडले मौन

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नवी दिल्ली : कोणत्याही धार्मिक गटाला द्वेष पसरविण्याला मुळीच थारा दिला जाणार नाही. धार्मिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे चर्चवरील हल्ल्याच्या घटनांनंतर प्रथमच मौन तोडले आहे.

नवी दिल्ली : कोणत्याही धार्मिक गटाला द्वेष पसरविण्याला मुळीच थारा दिला जाणार नाही. धार्मिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा खणखणीत इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे चर्चवरील हल्ल्याच्या घटनांनंतर प्रथमच मौन तोडले आहे.
दिल्लीत पाच चर्चवर आणि एका ख्रिश्चन मिशनरी शाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर मोदी हे अशा घटनांकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि काही ख्रिश्चन गटांनी केला होता. सर्व धर्मांचा समान आदर केला जाईल. धार्मिक श्रद्धा जोपासण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्याची खबरदारी माझे सरकार घेईल. प्रत्येकाला कोणत्याही प्रभावाखाली न येता आपला धर्म कायम राखण्याचा किंवा दुसरा धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. कोणत्याही धार्मिक गटाला मग तो अल्पसंख्यक असो की बहुसंख्यक छुप्या किंवा उघडउघड पद्धतीने धार्मिक विद्वेष पसरविण्याला मुभा दिली जाणार नाही, असे ते म्हणाले.
कुरियाकोस ऊर्फ चवारा आणि मदर युफ्रेशिया यांना संतपद बहाल करण्यात आल्याबद्दल विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय सत्कार समारंभात त्यांनी धार्मिक स्वातंत्र्याची भूमिका स्पष्ट केली.
-----------------
धार्मिक हिंसाचाराची तीव्र निंदा
धार्मिक हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या घटकांना कठोर इशारा देताना पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही कृतीआड आम्ही कोणत्याही धर्माविरुद्धचा हिंसाचार खपवून घेणार नाही. अशा हिंसाचाराची मी तीव्र निंदा करतो. धर्माच्या आधारावर विभागणी आणि वाढते वैमनस्य ही जागतिक चिंतेची बाब बनली आहे. प्रत्येक धर्माचा आदर ही प्राचीन भारतापासून चालत आलेली शिकवण आता कुठे जागतिक आध्यात्मिक संदेशात समाविष्ट होऊ लागली आहे. सध्या जग स्थित्यंतराच्या स्थितीत असून आम्ही हा पल्ला योग्यरीत्या ओलांडला नाही तर धर्मांधता, कट्टरतावाद आणि रक्तपाताच्या अंधारात फेकले जाऊ. जग तिसऱ्या सहस्रकात पोहोचले तरी तरी धार्मिक सलोख्याचे लक्ष्य गाठणे अवघड जाईल.
------------------
भारतीयांच्या डीएनएमध्येच
आदराची शिकवण
भगवान गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांचे विचार मांडताना मोदी म्हणाले की, सर्व धर्मांबद्दल समान आदर हा प्रत्येक भारतीयांच्या रक्तात(डीएनए)असायलाच हवा. प्राचीन भारतातील संयम आणि परस्पर आदर, सहिष्णुता ही सर्व धर्मांनी खऱ्या अर्थाने अंगिकारायला हवी.
-------------------
ओबामांच्या विधानाचा संदर्भ
भारतात अलीकडे धार्मिक आधारावर सर्व प्रकारची असहिष्णुता वाढीस लागल्याचे पाहता महात्मा गांधींनाही धक्का बसला असता असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले होते. त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ देत मोदींनी धार्मिक वैमनस्य हा जागतिक चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट केले.
------------------------
हेग कराराचे स्मरण
हेग येथे २००८ मध्ये झालेल्या मनावाधिकार परिषदेतील कराराचे स्मरणही मोदींनी करवून दिले. धार्मिक आधारावर सामंजस्याची गरज दीर्घ काळपासून अधोरेखित होत आली आहे. हा करार ऐतिहासिक असून त्यात धार्मिक स्वातंत्र्य आणि त्याचे रक्षण कसे करायचे हे निश्चित केले आहे. या करारातील प्रत्येक शब्दाला माझे सरकार बांधील राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
-----------------------
सबका साथ, सबका विकास....
सबका साथ सबका विकास हा विकासाचा मंत्र आहे. त्याचा अर्थ प्रत्येकाला अन्न, प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेश, प्रत्येकाला रोजगार, प्रत्येक कुटुंबाला निवारा, शौचालय, वीज हा आहे. ऐक्यातूनच हे शक्य असून ती बाब भारतासाठी अभिमानाची असेल. ऐक्य हेच आपल्याला बळकट करेल तर विघटन कमकुवत बनवेल. ही मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी ,अशी विनंती मी प्रामाणिकपणे करीत आहे, या शब्दांत त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.