शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

धर्म जागरण मंचाची डेडलाइन, म्हणे २०२१ पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवू

By admin | Updated: December 18, 2014 18:43 IST

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात राहणा-या सर्वांना हिंदू बनवू असे वादग्रस्त विधान धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ -  वाढत्या विरोधानंतर धर्म जागरण मंचाने  'घर वापसी'चा कार्यक्रम स्थगित केला असला तरी मंचाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधान करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. मुस्लिम व ख्रिस्ती समुदायाला भारतात राहण्याचा हक्कच नाही असे विधान मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले असून यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 
धर्मांतराच्या मुद्द्यावरुन सध्या संसदेत विरोधकांनी सरकारची कोंडी केली असून वाढत्या विरोधामुळे धर्म जागरण मंचाला मुस्लिमांना हिंदू धर्मात आणण्याचा कार्यक्रम स्थगितही करावा लागला. मात्र या धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी वादग्रस्त विधान केले. ख्रिश्नन आणि मुसलमानांना संपवून ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी भारताला हिंदू राष्ट्र बनवू असा आमचा संकल्प असल्याचे राजेश्वर सिंह यांनी सांगितले. धर्म जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत संघटना आहे.  राजेश्वर सिंह यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली तरी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. अल्पसंख्याक दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे आज मोदींचे छायाचित्र असलेली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. मोदींनी आज या दिनानिमित्त राज्यसभेत उपस्थित राहून जातीयवादाच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. धर्मजागरण मंचाचे नेते जे बोलत आहे ते भाजपाने स्वीकारावे किंवा त्यांचा विरोध करावा असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे. 
दरम्यान, धर्मांतराच्या मुद्यावरुन गुरुवारीदेखील संसदेत विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत यावर मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून मोदी सरकारने मात्र विरोधकांसमोर नमते न घेण्याची कणखर भूमिका घेतली आहे.