शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

धर्म जागरण मंचाची डेडलाइन, म्हणे २०२१ पर्यंत भारताला हिंदू राष्ट्र बनवू

By admin | Updated: December 18, 2014 18:43 IST

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात राहणा-या सर्वांना हिंदू बनवू असे वादग्रस्त विधान धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ -  वाढत्या विरोधानंतर धर्म जागरण मंचाने  'घर वापसी'चा कार्यक्रम स्थगित केला असला तरी मंचाच्या नेत्यांनी वादग्रस्त विधान करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. मुस्लिम व ख्रिस्ती समुदायाला भारतात राहण्याचा हक्कच नाही असे विधान मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी केले असून यावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. 
धर्मांतराच्या मुद्द्यावरुन सध्या संसदेत विरोधकांनी सरकारची कोंडी केली असून वाढत्या विरोधामुळे धर्म जागरण मंचाला मुस्लिमांना हिंदू धर्मात आणण्याचा कार्यक्रम स्थगितही करावा लागला. मात्र या धर्म जागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंह यांनी वादग्रस्त विधान केले. ख्रिश्नन आणि मुसलमानांना संपवून ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी भारताला हिंदू राष्ट्र बनवू असा आमचा संकल्प असल्याचे राजेश्वर सिंह यांनी सांगितले. धर्म जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत संघटना आहे.  राजेश्वर सिंह यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसली तरी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी यावरुन भाजपावर निशाणा साधला आहे. अल्पसंख्याक दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे आज मोदींचे छायाचित्र असलेली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. मोदींनी आज या दिनानिमित्त राज्यसभेत उपस्थित राहून जातीयवादाच्या मुद्द्यावर उत्तर द्यावे अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे. धर्मजागरण मंचाचे नेते जे बोलत आहे ते भाजपाने स्वीकारावे किंवा त्यांचा विरोध करावा असे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहे. 
दरम्यान, धर्मांतराच्या मुद्यावरुन गुरुवारीदेखील संसदेत विरोधकांनी गोंधळ घातला. राज्यसभेत यावर मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी काँग्रेसने केली असून मोदी सरकारने मात्र विरोधकांसमोर नमते न घेण्याची कणखर भूमिका घेतली आहे.