शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांना द्यावा लागणार मालमत्तेचा तपशील- योगी आदित्यनाथ

By admin | Updated: March 19, 2017 20:45 IST

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिलाच धाडसी निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिलाच धाडसी निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना 15 दिवसांच्या आत संपत्तीचा तपशील देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या अजेंड्याखाली काम करण्याचं जनतेला त्यांनी वचनही दिलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्र्यांनी कोणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्यं करू नयेत, असा सल्लाही त्यांनी मंत्र्यांना दिला आहे. राज्यात तरुणांना रोजगार मिळावेत यासाठी मोठे निर्णय घेण्यात येतील. तसेच शेतक-यांना सर्वात पहिली प्राथमिकता देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचा विकास खुंटवण्यासाठी आधीची सरकारं जबाबदार असल्याचा आरोपही आदित्यनाथ यांनी केला आहे. भाजपा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असेल. भाजपा सरकार उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राज्यातल्या आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचार आणि कौटुंबिक वादाला जनतेपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. राज्यात भेदभाव न करता विकास करणार असून, उत्तर प्रदेशची कोलमडलेली कायदा-सुव्यवस्थाही लवकरात लवकर सुस्थितीत आणणार आहे. महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणावर भर देण्यात येणार असून, राज्य सरकार उत्तर प्रदेशातील मागास वर्ग आणि गरिबांच्या उत्थानासाठी विशेष काम करणार आहे. शेती, शेतकरी आणि शेतात राबणारे कामगार ही आमची प्राथमिकता आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच जेवण, घर, आरोग्य आणि वाहतूक आदी सुविधांवर सरकार काम करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. सरकारी नोक-यांमधली नियुक्ती ही भ्रष्टाचारमुक्त करणार आहे. राज्यात उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे.