शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

मंत्र्यांना द्यावा लागणार मालमत्तेचा तपशील- योगी आदित्यनाथ

By admin | Updated: March 19, 2017 20:45 IST

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिलाच धाडसी निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिलाच धाडसी निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना 15 दिवसांच्या आत संपत्तीचा तपशील देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या अजेंड्याखाली काम करण्याचं जनतेला त्यांनी वचनही दिलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्र्यांनी कोणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्यं करू नयेत, असा सल्लाही त्यांनी मंत्र्यांना दिला आहे. राज्यात तरुणांना रोजगार मिळावेत यासाठी मोठे निर्णय घेण्यात येतील. तसेच शेतक-यांना सर्वात पहिली प्राथमिकता देण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचा विकास खुंटवण्यासाठी आधीची सरकारं जबाबदार असल्याचा आरोपही आदित्यनाथ यांनी केला आहे. भाजपा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असेल. भाजपा सरकार उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. राज्यातल्या आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचार आणि कौटुंबिक वादाला जनतेपेक्षा जास्त महत्त्व दिले आहे. राज्यात भेदभाव न करता विकास करणार असून, उत्तर प्रदेशची कोलमडलेली कायदा-सुव्यवस्थाही लवकरात लवकर सुस्थितीत आणणार आहे. महिला सुरक्षा आणि सशक्तीकरणावर भर देण्यात येणार असून, राज्य सरकार उत्तर प्रदेशातील मागास वर्ग आणि गरिबांच्या उत्थानासाठी विशेष काम करणार आहे. शेती, शेतकरी आणि शेतात राबणारे कामगार ही आमची प्राथमिकता आहे. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबरोबरच जेवण, घर, आरोग्य आणि वाहतूक आदी सुविधांवर सरकार काम करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळणार असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. सरकारी नोक-यांमधली नियुक्ती ही भ्रष्टाचारमुक्त करणार आहे. राज्यात उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासनंही त्यांनी दिलं आहे.