शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

तंत्रज्ञानात मागे असूनही मिग-२१ ने एफ-१६ कसे पाडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:17 IST

शंका अन् त्यांची तज्ज्ञांकडून उत्तरे...

एफ १६ हे पाकिस्तानचे आधुनिक विमान आहे. या विमानाच्या तुलनेत भारतीय मिग-२१ बायसन ही विमाने तंत्रज्ञानाने तुलनेने कमी असतानाही विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अतिशय कौशल्याने विमान चालवून एफ-१६ विमानाचा पाठलाग करत ते पाडले. दोन विमानांची लढाई कशी होते, हवेतच लक्ष्याचा वेध कसा घेतला जातो? याबाबत ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (निवृत्त) यांनी केलेले शंका समाधान.पाकिस्तानचे एफ १६ हे विमान मिगच्या तुलनेत सरस असतानाही भारतीय वैमानिकांनी पाडले. या दोन्ही विमानांच्या वैशिष्ट्यांबाबत काय सांगाल?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : भारताचे मिग २१ बायसन यात अनेक बदल करण्यात आले आहे. या विमानाच्या तुलनेत एफ-१६ हे अनेक बाबतीत आधुनिक आहे. या विनामात असलेल्या विमानविरोधी यंत्रणा, क्षेपणास्त्रे ही लांब पल्ल्याची आहे. तसेच उडण्याची क्षमता ही अतिउच्च दर्जाची आहे. मात्र, भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अतिशय धाडसाने आणि कौशल्याने बायसन विमान चालवून एफ-१६ विमान खाली पाडले.

भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानांची माहिती कशी मिळते. त्यावर कशा पद्धतीने अ‍ॅक्शन घेतली जाते?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : भारतीय हवाई दलाकडे शत्रुंच्या विमानावर लक्ष ठेवण्यासाठी एअर डिफेन्स यंत्रणा आहे. यात उच्च क्षमतेची रडार यंत्रणा असते. या द्वारे भारतीय हद्दीत घुसलेली शत्रुची विमाने ही त्वरित ओळखली जातात. या द्वारे अर्ली वॉर्निंग मिळते. भारतीय हद्दीत घुसण्याच्या आत ती ओळखली जातात. प्रत्येक विमानतळावर अशा परिस्थितीसाठी काही विमाने ही शस्त्रसज्ज असतात. काही मिनिटांत ती उड्डाणे घेऊन शत्रूची विमाने पाडू शकतात. या बरोबरच पेट्रोलिंग करणारी काही विमाने ही हवेतच असतात. त्याचबरोबर जमिनीवरूनही मॉनिटर करणारी यंत्रणा असते. त्याद्वारे शत्रूची विमाने ही पाडली जातात.

पाकिस्तामधील दहशतवादी तळांवर २५० किलोचे बॉम्ब भारतीय वैमानिकांनी टाकले. या बॉम्बची मारक क्षमता केवढी असते?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : भारताने दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलेले बॉम्ब मोठे होते. हजार किलोचे बॉम्ब आपण दहशतवाद्यांच्या तळावर टाकले. हे बॉम्ब लेझर गायडेड असल्यामुळे ते लक्ष्याचा अचूक वेध घेतात. यात मोठी स्फोटके असल्याने आजुबाजुच्या परिसरातील सर्वच गोष्टी उद्ध्वस्त करतात.

विमानातून पडलेल्या बॉम्ब यांनी लक्ष्याचा अचूक वेध घेतला की नाही हे कसे कळते, याची खातरजमा कशी केली जाते?ग्रुप कॅप्टन भालचंद्र लद्दे (नि.) : आजकालच्या विमानामध्ये तसेच क्षेपणास्त्रामध्ये लक्ष्याचा वेध घेण्यापर्यंत छायाचित्रण करण्याची क्षमता असते किंवा एक विमान लक्ष्यावर बॉम्बद्वारे मारा करतात. त्या विमानामागून येणारे दुसरे विमान हे लक्ष्य किती उद्ध्वस्त झाले याचे छायाचित्रण करत असते. याचबरोबर ड्रोन किंवा उपग्रहाच्या साह्याने किती नुकसान झाले याची माहिती घेतली जाते.

विमानांची लढाई कशी असते? भारतीय विमानांनी पाकच्या एफ-१६ या विमानांवर किती लांबून मारा केला असावा?दोन विमानांमध्ये होणाऱ्या लढाईला ‘डॉग फाईट’ म्हणात. रडारवरून दुसऱ्या विमानाची माहिती मिळताच आपली विमाने अवकाशात झेपावतात. शत्रूची विमाने पाडण्यासाठी तसेच त्यांचा वेध घेण्यासाठी विमानातही रडार यंत्रणा असते. या यंत्राची मदत घेत वैमानिक आपल्या कौशल्याचा वापर करत शत्रूची विमाने पाडण्यासाठी क्षेपणास्त्रे, मशिनगन यांचा वापर करतात.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक