शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘ब्रेक्झिट’वर पुन्हा सार्वमत घेण्यास नकार

By admin | Updated: July 10, 2016 01:45 IST

ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडावे की नाही यावर (ब्रेक्झिट) देश पातळीवर पुन्हा सार्वमत घेण्याची चार कोटींहून अधिक नागरिकांनी केलेली मागणी ब्रिटिश सरकारने फेटाळली असून आधीच्या सार्वमतामध्ये

थिरुवनंतपुरम : पश्चिम आशियात गेलेले केरळातील १५ तरुण बेपत्ता झाले असून ते इस्लामिक स्टेट (आयएस) या खतरनाक अतिरेकी संघटनेत सहभागी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे. याची चौकशी करण्याचे आदेश केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिले आहेत. केरळातील कासरगोड आणि पलक्कड जिल्ह्यातील हे तरुण आहेत. ते धार्मिक शिक्षणासाठी पश्चिम आशियात गेले होते. हे सर्वजण ३0 वर्षांच्या आतील असून, उच्च शिक्षित आहेत. काही जण डॉक्टर आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंतित झाले आहेत. त्यांना कट्टरपंथी बनवून आयएसमध्ये भरती करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी एका खासदारासह काही स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांना शोधण्यास मदत करण्याची विनंती केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुख्यमंत्री विजयन यांनी कोची येथे पत्रकारांना सांगितले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी करण्यात येईल. राज्याचे महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन यांनी कासरगोड येथे सांगितले की, हे तरूण आयएसच्या जाळ््यात अडकून त्यांच्या प्रदेशात गेले असतील, तर ही बाब खूपच कठीण होऊन बसेल. त्यामुळे त्यादृष्टीने तपास केला जाईल. तत्पूर्वी, कासरगोडचे खासदार पी. करुणाकरण यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. कासरगोडचे जिल्हा परिषदेचे सदस्य व्ही. पी. पी. मुस्तफा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बेपत्ता तरुणांकडून त्यांच्या पालकांना ईदनिमित्त एक व्हॉटस्अ‍ॅप संदेश आला होता. त्यात म्हटले होते की, आम्ही परत येणार नाही. येथे दैवी कायदा आहे. तुम्हीसुद्धा आम्हाला सामील व्हायला हवे. अन्य एका संदेशात म्हटले होते की, मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी आम्ही आयएसमध्ये सहभागी झालो आहोत. या संदेशांची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे, असे मुस्तफा म्हणाले. या तरुणांच्या कुटुंबियांनी खा. करुणाकरण, तिकारीप्पूरचे आमदार एम. राजगोपालन आणि मुस्तफा यांच्याशी संपर्क केला होता. (वृत्तसंस्था)