शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

मोदींच्या मंत्रिमंडळात टाइम मॅगेझिनने गौरवलेला डिमॉलिशन मॅन   

By अोंकार करंबेळकर | Updated: September 3, 2017 11:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवे बदल आज केले. विविध खात्यांना कोणते मंत्री लाभतील याची चर्चा गेला महिनाभर सुरू होती, मात्र एका नावाने आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले , ते नाव म्हणजे के. जे. अल्फोन्स कन्ननथनम. 

मुंबई, दि.३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात नवे बदल आज केले. विविध खात्यांना कोणते मंत्री लाभतील याची चर्चा गेला महिनाभर सुरू होती, मात्र एका नावाने आज सर्वांचेच लक्ष वेधून घेतले , ते नाव म्हणजे के. जे. अल्फोन्स कन्ननथनम. कन्ननथनन हे मोदी यांच्या मंत्रिमंडळातील पहिले व एकमेव केरळी मंत्री म्हणून ओळखले जातील. आजच्या फेरबदलापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात दक्षिणेचे मोजकेच मंत्री होते. त्यात तेलंगण आणि आंध्रचे व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, बंडारु दत्तात्रय, वाय. एस चौधरी आणि तेलगू देसमचे अशोक गजपती राजू यांचा समावेश होता. नायडू उपराष्ट्रपती पदावरती निवडले गेल्याने दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा नेता मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी बंडारू दत्तात्रेय यांचा राजीनामा घेण्यात आला. तामिळनाडूमधून कन्याकुमारीचे खासदार पी. राधाकृष्णन हे राज्यमंत्री बनवले गेले तर कर्नाटकातून जी.एम. सिद्धेश्वरा, रमेश चंद्राप्पा जिगजिनगी, अनंतकुमार, डी. व्ही. सदानंद गौडा मंत्री होते. कर्नाटकमधून उत्तर कन्नड जिल्ह्यातील अनंतकुमार हेगडे आज मंत्री झाले आहेत, तर कन्ननथनम यांच्या रुपाने प्रथमच केरळी व्यक्तीला मंत्रिपद मिळाले आहे. अल्फोन्स कन्ननथनम यांचा जन्म ८ आँगस्ट  १९५३ साली के. व्ही. जोसेफ आणि ब्रिजिथ जोसेफ यांच्या पोटी झाला. त्यांच्या वडिलांनी दुसऱ्या महायुद्धात लष्करी सेवा बजावली होती, महायुद्धानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांना कन्ननथनम यांच्यासह नऊ अपत्ये होती तसेच त्यांनी दोन मुलांना दत्तक घेऊन त्यांचाही सांभाळ केला होता. कन्ननथनम यांनी केरळमध्येच शिक्षण पूर्ण केले. अर्थशास्त्रामध्ये त्यांनी प्रथम क्रमांकासह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. १९७९ साली ते केरळ कँडरचे आयएएस झाले. १९८१ ते १८७३ या कालावधीत ते देविकोलमचे उपजिल्हाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी केरळचे शिक्षणसचिव पद सांभाळले. १९८५ साली ते केरळ दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक बनले. १९८८ साली ते कोट्टयम जिल्ह्याचे कलेक्टर बनले. पुढच्याच वर्षी त्यांनी संपूर्ण कोट्टयम शहर १००% साक्षर बनवण्याचे  अभूतपूर्व कार्य केले, त्यामुळे त्यांचे देशभरात कौतुक केले गेले. त्यानंतर १९९२ साली त्यांच्याकडे दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे डीडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. कन्ननथनम यांची ही कारकीर्द विशेष गाजली. या पदावर असताना त्यांनी १४ हजार ३१० बेकायदेशीर इमारती जमिनदोस्त केल्या आणि १० हजार कोटी रुपयांची जमिन मोकळी करुन घेतली. त्यांच्या या धडाकेबाज कामामुळे त्यांना द डिमॉलिशन मॅन अशी नवी ओळखच मिळाली होती.१९९४ साली टाइम मॅगझिनने त्यांचा १०० यंग ग्लोबल लिडर्सच्या यादीत समावेश केला होता. त्यांनी केंद्रीय वाहतूक, उच्च शिक्षण आणि जमिन मसूल विभागांचे सचिवपदही सांभाळले. २००६ साली त्यांनी सनदी सेवेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि ते राजकारणात आले. २००६ ते २०११ या कालावधीत ते कोट्टयम जिल्ह्यातील कांजिरापल्ली मतदारसंघातून डावी आघाडी पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले .२०११ साली ते भाजपात आले व पक्षाने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवले. आज कन्ननथनम हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य झाले आहेत. १९९४ साली त्यांनी जनशक्ती ही एनजीओ स्थापन केली तिच्या संपूर्ण केरळमध्ये २६५ शाखा आहेत. १९९६ साली त्यांनी लिहिलेलं मेकिंग ए डिफरन्स पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. ओ. राजगोपाल यांच्यानंतर कन्ननथनम भाजपाचा दक्षिणेकडील राज्यांमध्ये ताकद मर्यादित असल्यामुळे येथे पक्षाचे संसदेतही सदस्य कमी होते. यापुर्वी केरळचे ओ. राजगोपाल हे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सदस्य होते. त्यांनी संसदीय कामकाज, संरक्षण, नागरी विकास, कायदा, रेल्वे अशा अनेक मंत्रालयात १९९९ ते २००४ अशी सहा वर्षे राज्यमंत्रीपद सांभाळले. अर्थात ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडले गेले होते. १९९२ ते २००४ अशी बारा वर्षे ते राज्यसभेत होते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत तिरुवनंतपुरम मतदारसंघात त्यांचा केवळ १५ हजार मतांनी पराभव झाला आणि काँग्रेसचे शशी थरुर विजयी झाले होते. २०१६ साली ते नेमाम मतदारसंघातून केरळ विधानसभेत निवडून गेले. केरळमध्ये भाजपाचे ते एकमेव आमदार आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाKeralaकेरळGovernmentसरकार