शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

....हा तर लोकशाहीवर हल्ला - मनमोहन सिंग

By admin | Updated: November 7, 2015 01:28 IST

वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार हा एक प्रकारे लोकशाहीवरील हल्ला असून, धर्मनिरपेक्षता व अनेकत्वाचा आदर न केल्यास गणराज्य धोक्यात येईल, असा इशारा

नवी दिल्ली : वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार हा एक प्रकारे लोकशाहीवरील हल्ला असून, धर्मनिरपेक्षता व अनेकत्वाचा आदर न केल्यास गणराज्य धोक्यात येईल, असा इशारा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेवर त्यांनी चिंताही व्यक्त केली.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘स्वातंत्र्याशिवाय शांतता नाही, शांततेशिवाय स्वातंत्र्य नाही : नेहरूंचा वारसा आणि भारताचे भविष्य ’ हा या दोनदिवसीय संमेलनाचा विषय आहे. सिंग म्हणाले, की धर्मनिरपेक्षता हे भारतीय गणराज्यासाठी विश्वासाचे कलम आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाची श्रद्धा, विश्वास व पूजा करण्याच्या मूलभूत स्वातंत्र्याला संरक्षण मिळाले आहे. भारतीय संविधानाअंतर्गत सर्व धर्मांचा समान आदर करण्यात आला आहे. असे असताना काही कट्टरपंथी समूहांतर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. विचारांशी मतभिन्नता, भोजन वा जातीला आधार बनवून विचारवंतांची हत्या करणे समर्थनीय ठरू शकत नाही. असहमत होण्याचा अधिकार दडपण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले. (वृत्तसंस्था)