शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

By admin | Updated: May 4, 2017 01:27 IST

पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने

नवी दिल्ली : पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने म्हटले. दोन जवानांच्या शिरच्छेदानंतर संतप्त भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बुधवारी पाचारण करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बासित यांना बोलावून घेतले होते. १ मे रोजी जम्मूत पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांना ठार मारून त्यांचा शिरच्छेद केला होता, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले. पाकिस्तानच्या बट्टल सेक्टरमधील (बट्टल खेड्याच्या परिसरात) ठाण्यांनी गोळीबार सुरू ठेवून मारेकऱ्यांना संरक्षण पुरवले होते हे महत्त्वाचे. भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून, रक्ताचा माग रोझा नाल्यापर्यंत जातो. यावरून हे स्पष्ट आहे की, जवानांचे मारेकरी सीमारेषा ओलांडून आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. पाकिस्तानच्याच सैनिकांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला याचे पुरेसे पुरावे आहेत व पाकिस्तानने मारेकऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे, असे भारताने बुधवारी म्हटले. शिरच्छेदाचा प्रकार हा पूर्णपणे चिथावणी देण्याचाच असल्याचे भारत मानतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले. भारतीय जवानांच्या विटंबनेमध्ये पाकिस्तानी लष्कर सहभागी आहे, असे सरकारने ठामपणे म्हटले. पाकव्याप्त काश्मीरच्या भारताकडील भागातून मारेकरी आले आणि परत गेले.नेहमीप्रमाणे पाकिस्तानकडून इन्कारअब्दुल बासित यांनी पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांच्या शरीराची विटंबना केल्याचा इन्कार केला, असे बागले यांनी सांगितले. भारताचे म्हणणे माझ्या सरकारला कळवीन, असे बासित यावेळी म्हणाल्याचे ते म्हणाले.