शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

By admin | Updated: May 4, 2017 01:27 IST

पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने

नवी दिल्ली : पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने म्हटले. दोन जवानांच्या शिरच्छेदानंतर संतप्त भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बुधवारी पाचारण करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बासित यांना बोलावून घेतले होते. १ मे रोजी जम्मूत पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांना ठार मारून त्यांचा शिरच्छेद केला होता, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले. पाकिस्तानच्या बट्टल सेक्टरमधील (बट्टल खेड्याच्या परिसरात) ठाण्यांनी गोळीबार सुरू ठेवून मारेकऱ्यांना संरक्षण पुरवले होते हे महत्त्वाचे. भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून, रक्ताचा माग रोझा नाल्यापर्यंत जातो. यावरून हे स्पष्ट आहे की, जवानांचे मारेकरी सीमारेषा ओलांडून आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. पाकिस्तानच्याच सैनिकांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला याचे पुरेसे पुरावे आहेत व पाकिस्तानने मारेकऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे, असे भारताने बुधवारी म्हटले. शिरच्छेदाचा प्रकार हा पूर्णपणे चिथावणी देण्याचाच असल्याचे भारत मानतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले. भारतीय जवानांच्या विटंबनेमध्ये पाकिस्तानी लष्कर सहभागी आहे, असे सरकारने ठामपणे म्हटले. पाकव्याप्त काश्मीरच्या भारताकडील भागातून मारेकरी आले आणि परत गेले.नेहमीप्रमाणे पाकिस्तानकडून इन्कारअब्दुल बासित यांनी पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांच्या शरीराची विटंबना केल्याचा इन्कार केला, असे बागले यांनी सांगितले. भारताचे म्हणणे माझ्या सरकारला कळवीन, असे बासित यावेळी म्हणाल्याचे ते म्हणाले.