शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

धमकावणार्‍या वाळू व्यावसायिकांना एमपीडीए लावा प्रशासनाला निवेदन : आव्हाणे येथील ग्रामस्थांचे निवेदन

By admin | Updated: November 5, 2016 00:14 IST

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्‍यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी आव्हाणे ता.जळगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्‍यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी आव्हाणे ता.जळगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
निवेदन देताना राहुल सुभाष चौधरी, हुकूम दगडू चौधरी, गोपाल कालीदास चौधरी, संजय सुभाष पाटील, कांतीलाल शालीक पाटील, चंद्रकांत दिलीप जाधव, प्रदीप आधार पाटील, विठ्ठल जानकीराम पाटील, कपिल गोपाळ चौधरी, भगवान श्रीधर चौधरी, विक्रम श्रीधर चौधरी, निवृत्ती भगवान चौधरी, जगदीश धनसिंग चौधरी, मंगल अंकुश पाटील, नारायण पाटील, हर्षल पी.चौधरी आदी उपस्थित होते.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आव्हाणी ता.धरणगाव शिवारात आव्हाणे येथील शेतकर्‍यांची शेती आहे. शेतकरी गिरणा नदीतून एका पारंपरिक गाडरस्त्याने जातात. पण हा रस्ता वाळू व्यावसायिकांनी तोडला. वाळूची रात्रंदिवस उचल केली जाते. गुरुवारी एमएच १९ बीएम २३१३ व एमएच १९ झेड ९११९ यांचे मालक, चालक, मजुरांनी नदीमधील रस्ता तोडला. त्याचा जाब विचारला असता शेतकर्‍यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने मोठे खड्डे पडून पर्यावरण व जीवित हानी झाली आहे. याला जबाबदार कोण? या नदीमधील वाळू चोरीसंबंधी आव्हाणी व आव्हाणे येथील तलाठी फक्त बघ्याची भूमिका घेतात. वाळू चोर, डंपर, व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत नाही. गाडरस्ता तोडल्याने शेतकर्‍यांना डोक्यावरून शेतमाल (कपाशी व इतर माल) आणावा लागतो. संबंधित वाळू व्यावसायिक, मजूर, चालकांवर एमपीडीए कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. वाळू चोरी थांबवावी. शेेतकर्‍यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.