शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

धमकावणार्‍या वाळू व्यावसायिकांना एमपीडीए लावा प्रशासनाला निवेदन : आव्हाणे येथील ग्रामस्थांचे निवेदन

By admin | Updated: November 5, 2016 00:14 IST

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्‍यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी आव्हाणे ता.जळगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव व आव्हाणी ता.धरणगाव येथील शेतकर्‍यांना गिरणा नदीतून येण्यासाठी वाळू व्यावसायिकांनी रस्ताच ठेवला नाही. वाळू रात्रंदिवस चोरून नदीत ५० फुटांचे खड्डे केले. चोरीला मज्जाव केला तर वाळू चोरटे धमकावतात. त्यांच्यावर एमपीडीए कायद्यानुसार ठोस कारवाई करावी, अशी मागणी आव्हाणे ता.जळगाव येथील ग्रामस्थ, शेतकरी यांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
निवेदन देताना राहुल सुभाष चौधरी, हुकूम दगडू चौधरी, गोपाल कालीदास चौधरी, संजय सुभाष पाटील, कांतीलाल शालीक पाटील, चंद्रकांत दिलीप जाधव, प्रदीप आधार पाटील, विठ्ठल जानकीराम पाटील, कपिल गोपाळ चौधरी, भगवान श्रीधर चौधरी, विक्रम श्रीधर चौधरी, निवृत्ती भगवान चौधरी, जगदीश धनसिंग चौधरी, मंगल अंकुश पाटील, नारायण पाटील, हर्षल पी.चौधरी आदी उपस्थित होते.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आव्हाणी ता.धरणगाव शिवारात आव्हाणे येथील शेतकर्‍यांची शेती आहे. शेतकरी गिरणा नदीतून एका पारंपरिक गाडरस्त्याने जातात. पण हा रस्ता वाळू व्यावसायिकांनी तोडला. वाळूची रात्रंदिवस उचल केली जाते. गुरुवारी एमएच १९ बीएम २३१३ व एमएच १९ झेड ९११९ यांचे मालक, चालक, मजुरांनी नदीमधील रस्ता तोडला. त्याचा जाब विचारला असता शेतकर्‍यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने मोठे खड्डे पडून पर्यावरण व जीवित हानी झाली आहे. याला जबाबदार कोण? या नदीमधील वाळू चोरीसंबंधी आव्हाणी व आव्हाणे येथील तलाठी फक्त बघ्याची भूमिका घेतात. वाळू चोर, डंपर, व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत नाही. गाडरस्ता तोडल्याने शेतकर्‍यांना डोक्यावरून शेतमाल (कपाशी व इतर माल) आणावा लागतो. संबंधित वाळू व्यावसायिक, मजूर, चालकांवर एमपीडीए कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. वाळू चोरी थांबवावी. शेेतकर्‍यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.